Sunday, August 11, 2013

शरद पवार -दहशतवाद

  1. फेसबुकवर कालपासून शरद पवारांचा निषेध करणारे लेख पोस्ट वाचत होतो. मी भाषण ऐकले नव्हते त्यामुळे प्रतिक्रिया देणे योग्य वाटले नाहि. पण आता ते भाषण ऐकले आणि शरद पवार यांच्याविषयीचा माझा आदर द्विगुणीत झाला. नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे शरद पवार. टीव्ही वर आणि फेसबुक पवार फोबिया झालेल्या ज्ञांनी लोकांनी आवई उठवायला चालू केलि कि शरद पवार यांनी निवडणुकीमुळे इशरत जहा या अतिरेकी मुलीच्या कारवाईचे ...समर्थन केले.
    काही लोक भडकावू फोटो टाकून शरद्या कसा देशद्रोही आहे याचे दाखले देवू लागले. यातले सगळेच लोक काही भावनेने वाहत गेले कार्यकर्ते नाहीत तर स्वताला ज्ञानी समजणारे टीव्ही पत्रकार, बुद्धिवादी लोक याचा हेतुपुरस्पर अपप्रचार करणारे आहेत. त्यांना माहित आहे शरद पवारांना काय म्हणायचे आहे पण तेच नेमके जणते पर्यंत पोचू नये आणि आपली पोळी भाजून निघावी हाच त्यांचा हेतू आहे. त्यांना २०१४ च्या विषानुने झपाटले आहे.

    शरद पवार यांनी असे म्हटले आहे कि मुस्लिम समाज्यातील मुलाना त्यांनी शुक्रवारी त्यांच्याच मशिदीत बॉम्ब स्पोट केला म्हणून पकडले आणि दोन वर्ष तुरुंगात सडवले. पण अतिरेकी वेगळेच निघाले ह्या आणि अस्य घटनांनी पेटून उठुन एखादा अतिरेकी झाला तर या सगळ्या समाज्याला दोष न देता आपण हा प्रशासकीय व्यवस्थेचा (system ) दोष मानून ती सुधरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, प्रश्नाच्या मुळाशी जायला पाहिजे वरवरची मलमपट्टी कायम स्वरूपी इलाज होणार नाही.
    इशरत या संध्याकाळी प्रियकराला भेटायला गेलेल्या मुलीला सकाळी रस्त्यावर अजून दोघासोबत उभा करून गोळ्या घालून मारले जाते. खरच आपण कायद्याच्या राज्यात राहत आहोत का?

    उद्या पोलिस आपल्या घरी आले आणि म्हणाले कि तुम्हाला खुनाच्या संशयाखाली अटक होत आहे आणि दुसऱ्या दिवशी गोळ्या घालून मारले आणि सांगितले कि हा खुनी होता आणि दुसरा खून करण्याच्या तयारीत होता म्हणून मारले तर हा न्याय होईल का? . मग इथे तर वैयक्तिक प्रश्न नाही तर सामाज्याचा आणि देशाचा आहे. हिंदू वर अतिरेकी असल्याचा आरोप असलेल्यासाठी मानवी हक्काची आर्त हाक मारताना काही लोक दिसतात, हेच लोक त्या १७ निर्दोष तरुणांच्या मानवी हक्कासाठी सुद्धा पुढे आले असते ते सर्वात मोठे देशप्रेमी ठरले असते. पण असे होत नाही


No comments:

Post a Comment