१९९१ साली खुले आर्थिक धोरण स्वीकारल्या नंतर सरदार मनमोहनसिंग यांची जी जीनिअस म्हणून स्तुती झाली ती संपूर्णता चुकीची होति हे रुपायाची स्थिती, बेरोजगारी, आर्थिक वाढीचा दर, पेट्रोल -डिझेलचे दर, घराचे भाव, शिक्षण क्षेत्रातील भाववाढ,आणि वरचे वर होणार्या घोटाळ्यामुळे सिद्ध झाले आहे. पी व्ही नार्सिम्हराव सारख्या दूरदर्शी नेत्याच्या नेतृत्वाखाली तयार केलेली धोरणे एका माजी नोकरशहाणे अदबीने राबविली त्याची फळे भारताला त्या दशकात मिळाली. पण जेव्हा हाच नोकरशहा पंतप्रधान बनतो आणि दुसऱ्या सर्वसाधारण नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्यावेळी त्याच्या मधील मर्यादा स्पष्ट होतात. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आणि मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी अर्थशास्त्री आणि कारकुनाची गरज नसते. गरज असते ती मजबूत आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याची. त्याची तर उणीव गेले दहा वर्ष भासत आहे.
पण भारताचे दुद्दैव येवढं भयंकर आहे कि याला पर्याय पण फुफुट्यातून उटुन आगीत पडण्यासारखा आहे.
पण भारताचे दुद्दैव येवढं भयंकर आहे कि याला पर्याय पण फुफुट्यातून उटुन आगीत पडण्यासारखा आहे.
No comments:
Post a Comment