“उटबे रांडेच्या कॉलेजला
नाही का यायचे?”
आणि त्याने माझ्या तोंडातील
सिगारेट काढून स्वतःच्या तोंडात घातली. ती सिगारेट बिडी सारखी पकडून त्याने पटपट दोनचार
कश मारले आणि थोटुक शिल्लक असताना ती खिडकीतून टाकून दिली. आणि फेकल्या फेकल्या
धूर तसाच तोंडातून बाहेर येत असताना अजून म्हणाला.
“आयला विक्या रांडेच्या
रात्री चड्डी घालून झोपला होता कि काय, मायला सुधरला कि? मग कुणाच्या नावाने मुट
मारली रात्री ?”
तर हा पंक्या. निपानिहून
दररोज यायचा. याच्या पायात भिंगरी आणि तोंडात टेपरोकोर्डर. दोन्ही कायम चालू. मधून केसांचा तेरे नाम स्टाईल
भांग पाडलेला, हिरवा, निळा गडद शर्ट आणि गुड्ग्यावर तीन चार ठिकाणी फाटलेली जीन्स
घालून यायचा आणि कायम पोरींच्या घोळक्यात असायचा. हा सहनशीलतेचा पुतळा असावा. म्हणजे
त्याच पोरींच्या त्याच त्याच फालतू गोष्टी सहन करणे, त्यांना चहा पाणी चोकलेट
वगैरेची देवानघेवाण करणे ह्या अतिशय कंटाळा येणाऱ्या गोष्टी तो अविरतपणे अगदी
देवपूजा करावी तितक्याच तन्मयतेने करायचा. यातून त्याला काय प्रोडकटीव्ह मिळत होते
का नव्हते ते माहित नाही पण तो हि असली कामे अगदी मनापासून करायचा.
“आरे येवढा पाउस आहे कसं जायचं
कॉलेजला, बंद होईल जाऊ कि मग’
“ह्यो काय बार्शीचा पाऊस
नाय बे लगीच बंद व्हायला, हितं असंच जायचं असतंय”
मला पण जायचंच होतं. नाहीतर
आज मंजिरी दिसली नसती. मला वाटलं होतं एवढ्या पावसाचं ती यायची नाही पण पंक्याने
हितं सगळं असंच असतंय म्हणल्यावर बरं वाटलं. मग मी शून्य मिनिटात, दात घासून,
अंघोळ करून आणि ती माझी मळकी जीन्स घालून कॉलेजला तयार झालो. हॉस्टेल पासून दोनिकशे
मीटरवर असलेल्या कॉलेजला मी आणि पंक्या एका छत्रीतून निघालो. त्या डोंगरावरून एका
छत्रीत जाताना आम्ही दोघे दोन्हीकडून भिजत होतो.
“विक्या, असल्या पावसाच्या
मंद वातावरणात मला तुझ्याबरोबर एका छत्रीत भिजत जावं लागतंय, काय पाप केलं हुतं
कुणास ठाऊक मी” असं पंक्या म्हणाला.
चालत चालत कॉलेज आलं. आता
तो त्या पोरींच्या घोळक्यात जाणार होता.
मी म्हणालो, “पंक्या मी
आलोच”
“कुठं चालला बे रांडया, आता
त्या येड्या लवड्याचा पीरीयड हाय नव्हं!”
“मी आलोच संडास करून” असे
मी म्हणालो आणि तसंच कॉलेजच्या खालच्या बाजूने क्यांटीन मध्ये गेलो. थोडासा भिजलेलो
मी आत जाऊन त्या टेबलजवळ गेलो तर मंजिरी माझी वाटच बघत बसली होती. मला कमाल वाटली.
माझा अंदाज खरा ठरला. ती आली होती आणि माझी वाट पण बघत बसली होती. कधी कधी
आपल्याला आपलीच किमत माहित नसते हे मला तेव्हा कळले. एवढ्या पावसातून आली होती पण ती जरा सुद्धा
भिजली नव्हती कि तिच्या त्या लांबसडक वेड्यावाकड्या केसावर कुठे एखादा पाण्याचा
टपोरा थेंब सुद्धा दिसत नव्हता याचे मला आश्चर्य वाटले. ह्या कोल्हापूरच्या लोकांना
पावसाची सवय असली पाहिजे. तिनेच दोन चहा मागविले. माझे लक्ष चहाकडे नव्हते. ती आज
खूपच सुंदर दिसत होती. तिच्या सुंदरतेची तारीफ मी कधीच केली नव्हती पण आज ती
करावीशी वाटत होती. तिने डावीकडच्या बाजूला आलेले ते लांब केस उजव्या हाताने अतिशय
नाजूकपणे पाठीमागे उजव्या बाजूला टाकले आणि वाफाळलेला चाहाचा घोट घ्यायचे निमित्त
करत माझ्याकडे बघू लागली. मला कसंतरीच झालं आणि माझे लक्ष तिच्या उजव्या छातीवरून खाली
पोटा पर्यंत लोंबनाऱ्या काही केसावर खिळून राहिले. ह्या शहरातील मुलींचे केस एवढे
सुंदर कसे असतात आणि ते इतके चमकतात कसे याचे आश्चर्य वाटले. मला तिच्या त्या पुढे
आलेल्या केसात हात फिरवायची किंवा त्या केसांना हातात घेऊन कुरवाळायाची तीर्व
इच्छा झाली. त्या केसातून हात फिरवताना तिच्या भरलेल्या छातीला थोडासा नाजूक स्पर्श
मला आवडलाच असता. पण मनातील गोष्टी मनातच ठेवायची सवय झाली होती.
कधीच न अवघड्णारे आम्ही दोघे
आज अवघडलो होतो. बहुतेक त्या रोम्यांटिक वातावरणाचा परिणाम असावा. ती म्हणाली, “आज
लेक्चरच करायला नको वाटत आहे, वाटतंय असंच जावं आणि दिवसभर पावसात भिजत भटकत
राहावं. पन्हाळ्यावर नाहीतर गगनबावड्याला काय मज्जा येईल नाय?”
मला तर हेच पाहिजे होते.
“होय खूप मज्जा येईल, मला
पण भिजायला, पावसात डोंगरात फिरायला खूप आवडते. जाऊयाका चल गगन बावड्याला?”
“चल लगेच निघू”
आम्ही चांगले मित्रच होतो.
आता एवढ्या सुंदर आणि सुडौल मुलीबरोबर पावसात भिजायला ते पण पन्नास किलोमीटर लांब
जायचे आहे म्हणाल्यावर मी आपल्याकडील सराजम चेक केला तर खिशात दहा रुपयाची शेवटची
नोट आणि सात रुपये सुट्टे होते. महिन्याची पंधरावी तारीख होती.
तिथून इंटरकॉमवर लायब्ररी
मध्ये फोन केला. मला माहित होते पंक्या दोनचार पोरीना घेऊन तिथेच बसला असेल. तर
होताच.
“हं बोल रांडया?”
“काय नाही, जरा तुझी गाडी
पाहिजे होती, जरा कोल्हापूरला जायचंय”
“मग जाकी घेऊन”
गाडी घेतली. आज ती पहिल्यांदाच
माझ्या मागे बसली होती. तसे म्हणायला पहिल्यांदाच कोणीतरी मुलगी माझ्या गाडीच्या
पाठीमागच्या सीटवर बसली होती. तशा गावाकडे अनेक बायका बसवून नेल्या होत्या पण त्या
डियेड केलेल्या म्याडम वैगेराना शाळेत सोडायला. त्यात कसला आलाय विरंगुळा. ते तर
कामच होतं. पण हा असला प्रत्येक तरुणाला हावाहवासा प्रसंग तसा पहिल्यांदाच. ती
माझ्या अंगाला स्पर्श होणार नाही याची काळजी घेत मागच्या शीटवर बसली. आणि आम्ही
पावसात घुसलो. गाडी चालवत तोंड वर करून त्या स्वतः मधेच रममाण होऊन कोसळणाऱ्या पावसाचे
टप्पोरे थेंब तोंडावर घेतले आणि स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेत गाडी सुसाट चालवलली.
पण तो आंदन निखळ नव्हता. पुढे जाऊन पेट्रोल भरायचे होते आणि माझ्या खिशात पैसे
नव्हते हे मला माहित होते. पण मी रिस्क घेण्यात एक नंबर होतो. गाडी पेट्रोल पंपावर
नेली. चार लिटर म्हणालो त्या पेट्रोल भरणाऱ्या पोराने तिच्याकडे बघितले माझ्याकडे
एक कटाक्ष टाकला आणि त्या पावसात सुद्धा याच्या डोक्यातून धूर निघालेला मला दिसला.
पेट्रोल भरल्यानंतर मी खिशात हात घालण्याचे नाटक सुद्धा केले नाही. मंजिरीने पर्स
मधून काढून पैसे दिले होते. आमच्या सहा महिन्याचा दोस्तीमध्ये तिने मला ओळखून सोडले
असावे.
एकतर येवढा वेळ अविरत पाउस
चालू आहे तो बंद होतो कि काय याची भीती माझ्या मनात कायम होती. पण ती भीती तिच्या
चेहऱ्यावर मला दिसली नाही. तो फरक असेल मराठवाड्याचा आणि कोल्हापूरचा. पावसाचे
शिंतोडे अंगावर घेत आम्ही कोल्हापूर सोडलं आणि गगनबावड्याच्या रस्त्याला लागलो पण
अजून विशेष असं काही होतंच नव्हते. दोघामध्ये सुरक्षित अंतर ठेऊन ती खरेच पावसाचा
आनंद लुटते कि काय अशी भीतीदायक शंका माझ्या मनात येऊ लागली होती. आता गगनबावड्याचा
जंगलातील मस्त रस्ता लागला होता. दोन्ही
बाजूनी उंच उंच झाडांचे जंगल आणि मधेच पावसाच्या पाण्याने स्वच्छ निर्मळ रस्ता. मी
कमी वेगात गाडी चालवू लागलो आणि मला हळूहळू बदल जाणवू लागला. आमच्यातले अंतर कमी
झाले आहे असे जाणवले आणि ते चेक करण्यासाठी मी एका खड्ड्यातून गाडी नेली असता
तिच्या छातीचा नाजून स्पर्श एक पळभर माझ्या पाठीला झाला. आणि काही मिनिटातच तिच्या
नाजून लांबसडक बोटांचा हात माझ्या खांद्यावर पडला. तो बहुतेक माझ्या आयुष्यातील
कोणत्याही स्त्रीचा पहिला स्पर्श असावा. त्या पावसात माझ्या नाकातून आणि कानातून
वाफा निघत आहेत असे जाणवले.
पहिले पाउलच कठीण असते एकदा
धाडस करून पहिले पाउल टाकले कि पुढचा रस्ता रिकामा होतो त्या न्यायाने ती मला त्या
पावसात चिटकून अगदी बिलगून बसली आणि पावसाला त्याचे सलग तीन दिवस अविरत बरसणे सफल
झाल्याचे समाधान लाभले असावे. आणि त्याने आपला वेग वाढवून आमच्यावरील जलधारांचा अभिषेक
कमी किंवा बंद होणार नाही याची काळजी घेतली.
गगनबाववाड्याला पोहोचनार तोच
पाउस बंद झाला आणि इतका वेळ जलधारांच्या सुरु असलेल्या अभिषेका नंतर आता हव्याहव्याशा सूर्यकिरणांचा
अभिषेक चालू झाला. गगनबाववाड्याच्या कड्यावरून दूर पर्यंत दिसणारा कोकण प्रदेश
डोळ्याचे पारणे फेडत होता. हाजारो फुट उंच बसून दूर शेकडो किलोमीटर अगदी समुद्रापर्यंतच्या
धरणीचे रूप मी आपल्या डोळ्यात साठवत होतो. आणि त्या समोरच्या धरणीच्या पलीकडे
असलेल्या समुद्रावरून अक्राळ विक्राळ ढग आपल्याच दिशेने येत आहेत याची जाणीव होत
होती. आयुष्तातील मी अनुभवलेले सर्वात सुंदर आणि भीतीदायक दृश्य असावे. ह्या पर्वतरांगाना,
ह्या धरणीमातेला एका दणक्यात नेस्तनाभूत करण्याची ताकत त्या ढगामध्ये आहे असे मला जाणवले.
तेवढ्यात तिथून जाणाऱ्या गगनगिरी महाराजांच्या मठातील एका साधूने आम्हाला, “आरे
पोरांनो जावा घरी खूप मोठं विघ्न येताना दिसत आहे” असे सांगून बघितले आणि तो निघून
गेला. आणि काही मिनिटातच सुर्यनारायनाला आपल्या पंजात घेऊन त्या ढगांणी आमच्यासमोर
त्या पर्वतरांगाना आपल्या क्व्ह्यात घेतले आणि संपूर्ण अंधार करून ते ढग पाणी वोतू
लागले. इतका वेळ त्या ढगांमध्ये आणि निसर्गाच्या अक्राळविक्राळ रुपामध्ये समाउन गेलेलो
मी, तिने माझा हात तिच्या हातात घट्ट दाबून घेतल्यामुळे भानावर
आलो. हो मी तिथे एकटा नव्हतो, आम्ही दोघे होतो. नंतर आमच्या भावनांनी त्या भीतीवर,
निसर्गावर मात केली आणि आम्ही एकमेकांच्या मध्ये मिसळून गेलो. लहान मुलाला एखादे
खेळणे पहिल्यांदाच मिळाल्या नंतर तो जो उत्साहाने खेळत असतो तोच उत्साह. आणि ते खेळणे
आपले नसले आणि दुसऱ्याचे असले तर या उत्साहाला चार चांद लागतात आणि ते खेळणे
पुन्हा मिळते कि नाही ह्या आविर्भावाने ते लहान मूळ खेळू लागते अगदी तसे.
तिने मला सर्वस्व दिले.
तिच्या केसाचा सुगंध, तिच्या शरीराचा सुगंध तिच्या व्होटाची चव तिच्या जिभेची चव
आजून अगदी आहे तशी माझ्या तोंडात, नाकात दरवळत आहे. तीच होती तिच्यामुळे मला हा
स्वर्गीय सुगंध, स्वर्गीय चव अनुभवायला मिळाली. आणि मी ठरवले लग्न करीन तर
हिच्याशीच. मी असे नेहमीच ठरवायचो. एकदा गावाकडे मामीच्या दूरच्या नातेवाईकांच्या लग्नाला
गेलो होतो. त्या लग्नात एक सुंदर मुलगी दिसली होती. दिवसभर तिच्याकडे बघत होतो. ती
त्या ग्रामीण भागात खूपच सुंदर होती. वास्तविक पाहता मला त्या काळी सगळ्याच मुली सुंदर
दिसत असाव्यात. आता पण काही फरक पडलेला नाहीये. असो, मग ते लग्न झाले आणि आम्ही
आपापल्या गावी निघालो तर ती जवळ येऊन म्हणाली होती,
“तुम्ही कधी आलता
कोल्हापूरहुन?”
मग मी म्हणालो, “कालंच” आणि
पुढे काय बोलायचे ते मला समजले नव्हते. ती म्हणाली होती, “याकी आमच्या गावाला”. मी
येतो म्हणालो होतो. मग मी ठरवले होते, केले तर हिच्याशीच लग्न करायचे. वास्तविक
पाहता मला अशा मुली आवडल्या कि लग्न करू वाटायचे. आता समजते जुन्या लोकांना अनेक
बायका कशाकाय असायच्या ते.
ती गेली अमाप सुख देऊन
गेली. आयुष्यभारासाठी एक आठवण साठवण आणि सुगंध देऊन गेली. तिच्या सुगंधाची बरोबरी
जगात कुनाबरोरच शक्य नाही. ती, ते सुख एकमेवाद्वितीय होते. आपल्या नशिबात हे सुख
नसते. ते खेळणे दुसऱ्याचे होते, ते काही काळच देवाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिले
असावे. आता तिच्या नवऱ्याला ती तेच सुख देत असेल काय? तिच्या नवऱ्याला तिच्या त्या
केसाच्या, श्वासाच्या सुगंधाचे आपल्या इतकेच कौतुक असेल काय?
नंतर तिला मी शोधायचा
प्रयत्न केला नाही, कधीतरी एक दोस्त म्हणाला होता, ती ऑस्ट्रेलियात असते, नंतर एक दोस्त
म्हणाला होता तिचा डिवोर्स झालाय. ते ऐकून माझ्या काळजात एकदम चर्र झाले आणि तिचा
तो गोड आनंदी चेहरा माझ्यासमोर शुष्क, निस्तेज झाल्यासारखं भासला. आणि मी एकापाठोपाठ
दुसरी सिगारेट पेटवली होती.
आता मला ती कुठे आहे माहित
नाही, मी ते शोधण्याचा प्रयत्न पण करत नाही. पण जिथे असेल तिथे ती सुखीच असेल अशी
अपेक्षा करत असतो. हसऱ्या आनंदी बालपणाचे, तरुणपणाचे हा जिंदगीचा प्रवास काय करून
ठेवील भरोसा नसतो. एकदा चालत पुढे गेलो कि पुन्हा मागे येऊन फिरून चालू करायला
संधी नाही.
आज अशीच व्यालेंटाईन डे
च्या दिवशी तिची आठवण जखमेवरच पापुद्रा काढून ती ओली करावी आणि तिच्या वेदनांचा
आनंद लुटावा तसेच काहीतरी घडले.
https://www.maximizemarketresearch.com/
ReplyDelete