Thursday, February 11, 2016

डेविड हेडलिस आर्यांचे पत्र

प्रती,
डेविड हेडली उर्फ श्री देविदास हडलीकर
सप्रेम नमस्तुते!!!
आपण खरे आर्यच आहोत. आम्ही आपल्या आर्यभूमितून हिंदुस्थानात आलो. आपण पण आर्यभूमितून हिंदुस्थानातच यायला निघाला होतात पण चुकून अमेरिकेत पोचलात आणि आपणास वाटले तोच हिंदुस्थान आहे. अमेरिकेलाच चुकून हिंदुस्थान माफ करा अर्याव्रत समजून तुम्ही तिथल्या लोकांना रेड इंडीयन म्हणू लागलात. परंतु आपणास आता समजलेले दिसते आहे कि तुमचे खरे बंधू हे आर्यव्रतात म्हणजे आजच्या हिंदुस्थानात राहत आहेत. काही दुष्ट आणि आर्यद्वेस्टे लोक ह्या पवित्र अर्यभूमिला भारत म्हणतात पण लवकरच आपण मिळून त्यांचा बंदोबस्त करू अशी आशा आहे.
हिंदुस्थानातील आर्य लोक हे यवनी आक्रमणाच्या छायेत जगत आहेत आणि आपला आर्य धर्म धोक्यात आला आहे. हे आपणास समजताच आपण आपल्या भावांच्या मदतीला यायचाच होतास याची आम्हाला खात्री होती. आपण तसे मदतीला आला आहातच. ह्या भारतातील यवनी लोकांनी आणि ह्यांच्या नादीला लागून इथल्या काही शुद्र मूळनिवासिनी परमप्रिय आर्यसंस्कृती विसरून आर्यवर्ताचा हिंदुस्थान सुद्धा नाही तर चक्क भारत बनवून टाकला आहे. आर्यवर्ताचा हिंदुस्थान केला, हिंदुस्थानचा भारत केला इथपर्यंत आपण सहन केले पण जेव्हा हि पवित्राभूमी त्याच शुद्र मूळनिवासीणी मिळून यवनांच्या ताब्यात देण्याचा घाट घातला तेव्हा आपल्याला लढणे भाग आहे. हि लढाई आपण सुरु केलेली नाही तर आपल्यावर लादलेली आहे. आणि इतिहास गवाह आहे, जेव्हा जेव्हा आर्यावर संकटे आली आहेत तेव्हा तेव्हा आपण साम दाम दंड ह्या सगळ्या नितींचा उपयोग करून ती संकटे उलथून टाकलेली आहेत. अगदी महावीर जैन आणि गौतम बुद्ध पासून ते संत तुकारामा पर्यंत कुणीही आपल्या आर्यवर्तातील सत्तेला उलथून टाकू शकले नाहीत तिथे आजचे फुरोगामी कीस झाड कि पत्ती. आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय सत्तेला गेल्या पाच हजार वर्षात काही हादरे बसले पण तसल्या हादर्यांनी आर्यविचार पराभूत होणे शक्य नाही. हे तुला माहित असेलंच.
गेल्या पन्नास वर्षापासून आर्यवर्तात लोकशाही आलेली आहे. त्याला पण आपलेच पूर्वीचे आर्यवृतातील आजचे अंग्ला लोक कारणीभूत आहेत पण त्यांना पण लवकरच दृष्टांत होऊन तेपण पुन्हा वैदिक होतील अशी अपेक्षा आहे.
परंतु आजची प्राथमिकता हि आर्यभूमीवर आलेले यवनांचे आणि फुरोगाम्यांचे संकट उलथवून लावणे हि आहे. आज लोकशाही मार्गाने मिळवलेल्या सत्तेचा आपल्याला त्यासाठी पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. श्री डेविडजी माफ करा देविदासजी आपण फक्त आम्ही सांगेल तसे बोलत राहा बाकी आम्ही सर्व करतो. आम्ही आपले लोक इथल्या व्यवस्थेत इथून तिथून सगळीकडे अगोदरच पेरलेले आहेत. त्यामुळे एकदा उठाव झाला कि याभूमीला आर्यभूमी म्हणून घोषित करणे कठीण नाही. एकदा तसे झाले कि इथले मूळ लोक आपोआपच आपले गुलाम होऊन जातील. त्यासाठी हि लोकशाही व्यवस्था आणि संविधान हे कसे घातक आहे हे हिथल्याच लोकांच्या गळी घातले पाहिजे. आणि त्याची काळजी नसावी. आम्ही इथल्या संविधानाच्या विरोधात सावकाश सावकाश विष पेरत आहोत आणि त्याचा फायदा पण दिसू लागला आहे. इथले मूळ लोकंच आता आर्य संस्कुर्तीचे गोडवे गावू लागले आहेत. तुम्ही फक्त बघत रहा ह्या आर्यवर्तातच नाही तर संपूर्ण वसुंधरेलाच अर्यावृत करणे हे आपले उद्दिष्ट आहे आणि तो दिनू लांब नसेल. काही शतके वाट पहिली आहे अजून फक्त काही दशके थांबायचे आहे.
परंतु सुरुवात आपल्याला यवनांना ह्या हिंदुस्थानातून हाकलून देऊन इथे अनियंत्रित आर्यसत्ता प्रस्थापित करुण करायची आहे. .
आपलेच बांधव.
सदा वत्सले.
@विकासगोडगे

No comments:

Post a Comment