Monday, August 26, 2013

पुन्हा गरिबी हटाव खांग्रेस

गरिबी हटावचा आवडता नारा निवडणुकीसाठी कायम राहावा म्हणून गरिबी हटावन्यापेक्ष्या ती राहिलेलीच अधिक सोयीचे आहे हे देश्याच्या पहिल्या आणि राज्यकर्त्या कुटुंबाने वोळखलेले आहे. त्यामुळे इथून पुढे गरिबी टिकवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जातिल. ८०% लोकांना स्वस्तात अन्नधान्य पुरवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देवून गरिबांच्या नावाखाली वितरण व्यवस्थेतील लोकांचा गबर गंड होण्याचा मार्ग शोधला आहे.  हेच लोक पुढील प्रत्येक निवडणुकीत सत्तेतील पक्ष्याला मदत करतिल. जवळ जवळ फुकटच अन्न धन्य मिळत असल्यामुळे आताच मिळत नसलेले शेतमजूर काही दिवसांनी मिळणारच नाहीत. सरकारी धान्य विपुल प्रमाणात मिळत असल्यामुळे बाजारातील धान्याची किमत कमीच राहणार, सरकारला हा खर्च असह्य होणार असल्यामुळे बाजामुल्या कमीत कमी कसे राहील याची काळजी सरकार तर्फे घेतली जाइल.

आज बाजारात  ज्वारीला दोन हजार आणि तुरी तीन हजार रुपये मिळणारा भाव नंतर किती होईल याचा विचार पण करवत नाही. आणि कमी नाही झाला तरी वाढणार पण नक्कीच नाही. गरिबांना गरीब ठेवून आणि शेतकर्यांना पिळून घेवून हे सरकार कुणाचे भले करणार आहे?. या विधेयकासाठी चार लाख कोटीचा भर सोसणारे हे सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून काय घंटा करत आहे काय? शेतकरी आणि एकूणच देश विरोधी विधेयकाचा जाहीर जाहीर निषेध.



No comments:

Post a Comment