Wednesday, July 17, 2013

उस पिक, तथाकथिक तत्वज्ञ आणि विचारवंत

हुटावरून शेळ्या राखणारे तथाकथिक तत्वज्ञ आणि विचारवंत म्हणत आहेत कि उस पिक बंद करा . लयच भरि. राव दुष्काळ हटेल . त्यांना विचारतो आरे भावानो तुम्हाला तूर डाळ आणि जवारी खावू घालून आमचे पोट नाही भरत राव, आणि तुम्ही आम्हाला कश्याला गिन्यान शिकवता, कि उस वाइट , साखर कारखाने वाईट , जे असे म्हणत आहेत त्यांच्या बापजाद्यांनी कधी गावात एखादी संस्था काढली आहे का त्यात गावातल्या पोराला नौकरी लागावी? शेतकऱ्यांच...्या कैवार्यांनी सांगावे कि बाबा तू उस करू नको आणि हे पिक लाव म्हणजे श्रीमंत होशिल. आरे भावा तूर, कापूस, जवारी लावून वघितले शेतकरी भिकारीच! डाळीचा भाव तुम्हाल साठ रुप्पये चालत नाही? जवारी तीस रुपये म्हणजे महाग, गहू तर वीस च्या आताच मिळायला पाहिजे, बाबो साखर तीस रुपये लय महाग, (आणि उस दारासाठी आंदोलन करणारे हेच लोक) हे काय शेतकऱ्याला समजत नाही का? एक वर्ष दुष्काळ पडल्यावर ज्यांना साखर आणि उस ह्या निमित्ताने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बाण मारायची संधी मिळाली आहे त्यांना मी एकाच प्रश्न विचारतो बाबानो आम्हाला पर्यायी पिक द्या , भाव द्या आम्ही तुमच्या मागे येतो. आहो दोन तोण्डि महनडुळ म्हणजे, कांद्याचा भाव वाढला म्हणून पुण्यात आंदोलन करणे आणि कांद्याचा भाव कमी झाला म्हणून गावाकडे जावून शिव्या देने. शेतकऱ्यांची पोरे शिकली आता कळते त्यांना पण सारे. दोन एकर तीन एकर वर भागणार नाही म्हणून शिक्ष्यान घ्या आणि नौकरी करा हा संदेश काय वाईट होता का शरद पवारचा ? पण त्याचा अर्थ प्रसार माध्यमांनी किती वाइट काढला हे पण शेतकऱ्यांची पोरे बघत आहेत! अगदी डोळसपणे! काही लोकांच्या घुंगराच्या अवाजापाय शेतकर्याचा का मनून बळी देताय, घुंगरे वाले लय दिस राहणार नाहीत हे आपल्याला माहित आहे .

No comments:

Post a Comment