Friday, May 13, 2016

नागराज आणि वादविवाद

गरिबाला श्रीमंत  झाल्यावर सुद्धा  गरिबी सोडत नाही. कारण जुने श्रीमंत नवीन श्रीमंतावर, कधीकाळी आपल्यापुढे हमाली करणारा आज  रुबाब करू लागला म्हणून जळत असतात. बाकी  गरीबांचं काम तर फक्त जळनेच असते. ते पण जुन्या श्रीमंतावर नाही , आपल्यातून मोठ्या झालेल्या श्रीमंतावर. कारण जुन्या श्रीमंताची गरिबांनी अगोदरच गुलामी पत्करलेली असते आणि आपल्यातून वरती गेलेल्या गरीबाची गुलामी स्वीकारणे सोडा पण त्याला बदनाम करून कसा  अजून खाली खेचता येईल याचेच प्रयत्न होत असतात. मग ह्या बदनामी साठी गरिबांना जुने श्रीमंत मदत करतात आणि काय हवे नको त्याची मदत करतात. रिसोर्सेस पुरवतात. लोकमतची बातमी योगायोग कशी असू शकते.

मग एकदा आपल्यातून मोठा झालेला बदनाम झाला कि हुर्रे हुर्रे , कशी काय जिरवली, आम्ही असे म्हणून स्वतःच्याच टिर्या  बडवून घेतात.

नेमकं तसंच झालंय, नागराज मंजुळेच्या बाबतीत. फ्यांद्री च्या यशानंतर कुणालाही नागराज आणि त्याची बायको वेगळे राहतात किंवा नागराजने त्याच्या बायकोला सोडले आहे हे समजले नव्हते. पण जेव्हा "सैराट" बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घालू लागला  तेव्हा काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. आणि हे प्रस्थापिथ लोक काहीतरी कुरुळीच्या  शोधात होते त्यांना शेटजी भटजीचा पेपर असलेल्या लोकमतने ती कुरुळी पुरवली.

मी म्हणले आहे ना वरती, "अशा वेळी श्रीमंत किंवा प्रस्थापिथ लोक गरिबांना हत्यारे पुरवतात आणि गरीबं लढत बसतात" कुणासाठी हे त्यांना माहित नसते. त्यांना वाटते हे स्वतासाठी लढत आहेत, स्वजातीसाठी लढत आहेत पण तसे काही नसतं. हे त्यांना पण माहित नसतं.


आता ह्या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे नागराजच्या पहिल्या बायकोसाठी कुणाला किती दु:ख आहे किंवा आखिल स्त्रिजातीसाठी आपल्याला किती कनव हा भाग आपण जरा लांब ठेऊया.   ह्यातील काही टीकाकार नागराजच्या यशाने जळून टीका करत आहेत का?  तर तसे बिलकुल नाही .

ह्यासाठी आपण जरा मुळात जाऊ. सैराट यायच्या अगोदर हवा झाली कि हा सिनेमा मराठा विरोधी आहे. त्याला अनेक ठिकाणाहून फूस पण मिळाली पण सिनेमा मध्ये मराठा विरोधी असे काहीच नाही. पण "आता आम्हाला नागराज हा हिरो मिळाला आणि कशी काय आम्ही पाटलाची पोरगी पळवून नेली" किंवा "परशा पाटलाच्या पोराला उभा चीरीन म्हणतो , बघा लक्षात ठेवा!" असले स्टेटस पडू लागल्याने काही मराठा तरुण अस्वस्थ झाले. आणि फेसबुकवर आपल्या भावना दुखायला तर निमित्तच हवे असते. नुसतं "ऊस" म्हटले कि दोन्हीकडल्या भावना दुखावतात.अशा गोष्टींचा वापर सोशल मीडियातील आणि वातानुकुलीत खोलीत बसून धोरणं बनवणाऱ्या चाणक्यांनी घेतला नसता तर नवलंच.

तेच झाले,  नागराजने कुणाच्या बोच्याखाली जाळ लावलाय,आणि लय पोळतय म्हणून बोंबलत कोण सुटलंय हे बघून मला आश्चर्याच वाटत आहे. आणि ज्याच्या बोच्याखाली सैराटने जाळ लावलाय ते लोक  बोच्यावर बर्फ ठेवून हा धिंगाणा बघत आहे.

राहता राहिलं नागराजच्या बायको सोडण्याचे त्याविषयी आपल्याला अजून काहीच माहिती नाही आणि त्याने खरी जरी सोडली असली तरी बायको सोडणे गुन्हा नाही. न्यायालयात काय असेल तो न्याय होईल.आपलयाला  हितं दररोज दारू पिऊन सुजलेले तोंड घेऊन शिवाजी महाराजांची भूमिका करून मराठी लोकांना जगवनारा आवडतो आपण गरिबीतून वरती येऊन प्रथापिथाच्या बुडाखाली जाळ करणारा नागराज पटत नाही? कारण आपल्या भावना उगीच नागराजच्या भक्तांनी दुखावलेल्या असतात.

मोठे व्हा !







No comments:

Post a Comment