Sunday, March 8, 2015

चिंतनीय येडझवेपण

हळु हळु मी येडझवा आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे.  मग आजपर्यंत लोक मला येडझवा समजत नव्हते का? तर समजत होते, पण समोर बोलून दाखवत नव्हते. कारण येडझवा असणे आणि त्यावर शिक्कामोर्तब होणे यामध्ये एक विंडो पिरीयड असतो तो संपला नव्हता. अधिकृत येडझवा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी तुम्हाला काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात.  काही वर्षापूर्वीच येडझवा असण्याची काही लक्षणे मला जवळचा  समजत असलेल्या लोकांना माझ्यात दिसायला चालू झाली असावीत. जेव्हा मी आणि माझे मित्र गावातील देवाच्या जत्रेत दिवसभर फिरलो, नायकीनीवर पैसे उधळले, पाळण्यात बसलो, बर्फाचे गोळे घेऊन एकमेकांच्या डोक्यात फोडले आणि बाकी मित्र देवाच्या दर्शनाला देवळात गेले तेव्हा मी बाहेरच्या मटणाच्या खानावळीत गेलो. मटणाच्या खानावळीत जाणे विशेष नव्हते पण जत्रेला जाउन देवाचे दर्शन न करणे आणि वरून मटन चोपणे हे म्हणजे पाप होते. आता माझ्या सात पिढ्या नरकात जाणार ह्या नजरेने अगोदर दोस्तांनी आणि नंतर गाववाल्यांनी भविष्य वर्तवायला चालू केले. तसे माझ्याविषयी भविष्य वर्तविणे हा माझ्या जवळच्या आणि लांबून जवळच्या लोकांचा आवडता उद्योग होता आणि आहे. तर आपल्याविषयी चर्चा चालू होणे हे एक महत्वाचे येड्झवेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यानंतर हळु हळु सिजनड येड्झवा बनण्याच्या मार्गाने आपला प्रवास चालू झाला असावा. तर हे येड्झवेपणा किंवा येड्झवे आसने म्हणजे काय ? तर यावर अजून एकमत झालेले नाही. उदाहरणार्थ जेव्हा पहिल्यांदा जत्रेला जाउन देवळात गेलो नाही म्हणून माझ्या लोकांनी मला येड्झव्यात काढले तेव्हा ते जाउन दगडाच्या पाया पडणार आणि खुशहाल राहूदे अशी दगडाला मागणी करून   समाधाणाने घरी परतणार म्हणून मी पण त्यांना येड्झव्यात काढल्याचे आठवते. पण मीच खरा येडझवा आहे हे त्यांनी बहुमताने सिद्ध केले. तर बहुमत हे मूर्खपणाचे लक्षण आहे असा तेव्हापासून झालेला समज आजून कायम आहे. सामाजिक आणि जैवीन नियमाप्रमाणे हा येड्झवेपणाचा रोग बळाउ लागला आहे. रोगाच्या ह्या पायरीवर बाकी समाज आपल्याला येडझवा वाटू लागतो आणि समाजाला आपण येड्झवे असल्याची खात्री पटलेली असते. तर थोडक्यात माझ्या येडझवेपणाचा विंडो पिरियड संपून आता मी संपूर्ण येडझवा झालो आहे  असे प्रमाणपत्र परवा वडिलांनीच दिले. मी आपल्या नवीन घराची वास्तू शांती करणार नाही असे ठामपणे सांगितले आणि वडिलांनी ते प्रमाणपत्र बहाल केले. तर आता वडिलांनी बहाल केलेल्या प्रमाणपत्रावर बाकीचे नातेवाईक आनंदाने सही वैगेरे करतील यावर माझा तंतोतंत विश्वास आहे. पण मला अजून येडझवेपणाच्या अत्युच्च पातळीवर पोचण्यात यश आलेले नसल्याने वडील पण त्याच समाजाचा भाग असले तरी माझ्यात त्यांना येडझवा म्हणण्याची ताकत आलेली नाही.  कारण बाकी सगळी सांस्कृतिक, धार्मिक, पारंपारिक बंधणे झुगारली असली तरी आपले नातेवाईक, आई, वडील, भावंडे सोडून बाकी सगळा समाज मूर्ख असतो हा संस्कार झुगारण्याच्या अत्युच्च पातळीचा य़ेडझवेपणा अजून आत्मसात करणे बाकी आहे.

तर आता मला शहाणं म्हणून घ्यायचं असेल तर त्यांच्यात मिसळायला हवे. ते काय चांगले काय वाईट ठरवतील ते निमुटपणे सहन करून "होयबा" व्हायला हवं. पण मला यांच्याकडून शहाणे म्हणून घ्यायची इछ्या अजिबात नाही. कारण चिंतनाने मिळवलेले हे एडझवे पण घालवणे आता माझ्या पण हातात नाही. कारण खरी गोष्ट फक्त मलाच माहित आहे. म्हणजे लोक भित्रे असतात, त्यांच्याकडे एकटे उभा राहण्याची ताकत नसते हे अंतिम सत्य आहे. ह्या भीतीतून मग धर्म, पक्ष, वेगवेगळ्या संघटना, मित्रमंडळे, ग्रुप किंवा टोळकी स्थापन होतात. मग कधी आपण जन्मताच एखाद्या टोळक्याचा भाग असतो  किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी अश्या टोळक्यात सामिल होतो. एकदा का अश्या टोळक्यात सामील झालो कि मग आपले स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत नष्ट होते. थोडक्यात आपली किमत शुन्य होते. आणि मग मेंढराप्रमाणे त्या टोळक्याचे जे विचार असतील ते आपल्याला मान्यच करावे लागतात, नाहीतर आपली येड्झवे म्हणून टोळक्यातून हकालपट्टी होऊ शकते. अश्या वेळी टोळक्याला आणि टोळक्याच्या म्होरक्याला पण माहित नसते कि ते सगळेच गुलाम आहेत. तर एकूणच मला अश्या गुलामांच्या टोळक्यात सामील व्हायचे नसल्याने माझ्या येड्झवेपनाला काहीच ईलाज नाही या मतावर मी येउन पोचलो आहे.   त्यामुळे मी या शहाण्या माणसापासून दूर राहण्याचे ठरवले आहे.   आता मी येडझवेपनाच्या अशा पायरीवर येउन पोहचलो असल्याने येड्झवेपणावरच्या माझ्या चिंतनातून पुढे आलेले येडझवेपणाचे खालील दोन प्रकार आढळतात -

१. अकस्मात येडझवेपण  - या प्रकारे आपल्याला एकदमच सगळे येडझवे वाटू लागतात. "त्यांच्या" प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला हसू येते. तुम्हाला  दया येते. आणि तुम्ही 'त्या" येडझवयांच्या नादी लागायचे नाही म्हणून सगळ्या अस्तित्वातील कळपातून एकदमच बाहेर पडुन एकटेच आयुष्च्याचा आनंद लुटू लागता.
२. चिंतनीय येडझवेपण - या प्रकारे आपल्याला हळु हळु गोष्टी उमजू लागतात, उमगू लागतात. मग सावकाश तुम्ही कुणाला नाराज न करता मूर्खांच्या गर्दीतून बाहेर निघू लागता. त्यावेळी बाकी लोक म्हणतात, "तो बराय, पण कधी कधी येडझव्यासारखा वागतो"  हा तुमचा विंडो पिरियड असतो. मग हळु हळु एकदिवस तुम्ही संपूर्ण येड्झवे पण प्राप्त करता. यावेळी आपले आई, वडिल, बायका, पोरं पण आपल्याला येडझवा म्हणू लागतात. त्यावेळी आपण मानवी बुद्धिमत्तेच्या आणि चिंतनाच्या अत्युच्य पातळीवर तरंगत असता. तेच आयुष्याचे यश असते. सगळ्यांना ती अवस्था प्राप्त करणे महाकठीण.


























No comments:

Post a Comment