Saturday, November 29, 2014

"जातीसंस्थेचा इतिहास आणि काही जातींचा इतिहास प्रकाशन वर्णन

काल संजय सोनवणी यांच्या  "जातीसंस्थेचा इतिहास आणि काही जातींचा इतिहास" ह्या पुस्तक प्रकाशना वेळी प्रा. हरी नरके, मा.प्रसन्न जोशी, मा. डॉ.सदानंद मोरे,व डॉ. श्रीपाल सबनीस ह्या मान्यवरांची मते आणि भूमिका ऐकायची संधी मिळाली. संजय सोनवणी यांच्या प्रस्तावनेनंतर प्रसन्न जोशी यांनी आपल्या वोघवत्या शैलीत मराठा समाज्याच्या दुटप्पी भूमिकेवर खरा खरा वोरखडे वोढले. मराठा समाजातील बुद्धिवाद्यांनी मराठा समाजाच्या प्रबोधनासाठी काही केले नाही, जे काय केले ते समाज सुधारण्यासाठी केले असे मत मांडले. मराठा समाज क्षत्रियत्व मिळावे म्हणून लढला आणि आता शुद्रत्वासाठी भांडत आहे हि मराठ्यांची दुटप्पी भूमिका त्यांनी चव्हाट्यावर आणून समाज सुधारणेच्या दिशेने योग्य पाऊल टाकले. म्हणजे मराठ्यांनी दोन डोंगरावर पाय न ठेवता एकाच डोंगरावर पाय ठेऊन जातीर्निर्मुलनासाठी काम करावे असा सल्ला दिला.  प्रसन्न जोशी यांनी अ ह साळुंके यांचा उल्लेख कश्यासाठी केला ते आता आठवत नाही. पण त्यांनी जाता जाता नेमाडे ह्या विषयाला मधेच हात घातल्यामुळे सभाग्रहात जरासे चैतन्य निर्माण झाले. "जवखेडा घटनेचा निषेध नेमाडेंनी का केला नाही?" ह्या प्रश्नाने तिथे उपस्थित असलेल्या नेमाडपंथीयांचे आणि विचारपिठावर उपस्थित हरी नरके यांचे कान टवकारले गेले असावेत. तसेच प्रसन्न जोशीं यांनी संजय सोनवणीनि मांडलेल्या मतासाठी आणि जुन्या अभ्यासकांच्या खोडलेल्या मतासाठी मार खायला तयार राहण्याची प्रेमळ सूचना पण केली. नंतर हरी नरकेनी या सूचनेला अनुमोदन देऊन "रात्रंदिनी त्यांना युद्धाचा प्रसंग" असे नमूद करून ते तुकाराम महाराजांचे खरे अनुयायी असल्याचे दाखवून दिले. मार खाणे हे प्रसिद्धी साठी जरुरीच असते.पण तो मार त्यांना कुणाकडून अपेक्षित आहे ते दहा वर्षापूर्वी झालेला भांडारकर संस्थेवरील हल्ल्याच्या आठवणीने श्रोत्यांच्या लक्षात आलेच. एक दिवस अगोदरच नेमाडेना महात्मा फुले यांच्या नावाचा पुरस्कार दिलेला असल्याने हरी नरके,  नेमाडे यांचे समर्थन करताना म्हणाले कि एका घटनेवरून त्यांचा निषेध व जयजयकार करू नये पण आयुष्यभराच्या कामाकडे बघून त्यांना तोलावे. हे ऐकल्या नंतर माझ्या सारख्या नेमाडपंथ्याचा जीव भांड्यात पडला. संजय सोनवणी यांना पण त्यांच्या एका पुस्तकावरून तोलू मोलू नका संपूर्ण आयुष्याचे काम बघूनच त्यांच्या विषयी मत बनवा अशी सूचना वजा विनंती त्यांनी श्रोत्यांना केली.  विद्रोह करणे म्हणजे फक्त ब्राह्मणांना शिव्या देणे नाही. पण आता खरे अन्याय करणारे कोण आहे त्यां जातीचे नाव घेऊन त्यांना ठोकण्याची गरज पण हरी नरके यांनी नमूद केली. त्यांना अपेक्षित असलेली ती जात "मराठा" असावी असा माझा अंदाज आहे. मधेच मला एक अर्जंट फोन आल्यामुळे पुढचे प्रबोधन करून घ्यायची संधी मला गमवावी लागली. त्यामुळे डॉ मोरे आणि डॉ सबनीस यांना ऐकण्यासाठी पुढच्या कार्यक्रमाची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.
संजय सोनवणी यांच्या या अगोदरच्या पुस्तक प्रकाशना वेळी डॉ सबनिसांना खेडेकरांचा उल्लेख का करावा लागला हे समजले नव्हते. यावेळी खेपेला  पण प्रकाशनावर भांडारकर संस्था, अ ह साळुंके, खरे दुश्मण, मराठा राखीव जागा याचेच सावट होते.

No comments:

Post a Comment