Tuesday, November 18, 2014

भारतातील बदलती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती

लोकशाही मध्ये एखादाच पक्ष किंवा घराणे दीर्घकाळ सत्तेवर राहणे हे अपरिपक्व लोकशाहीचे द्योतक असते. २०१४ भारतामध्ये खऱ्या अर्थाने बिगर काँग्रेसशी सरकार आले. जे कधीना कधी व्हायचेच होते. मनमोहन सिंग सरकारने लोकांना चंद्र जरी आणून दिला असता तरी ते पडलेच असते. त्याला कारणीभूत आहे भारतातील बदलत्या, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक जानिवाकडे काँग्रेसने केलेले दुर्लक्ष. काँग्रेस पक्ष हा १९६०, १९८० च्या दशकात बनवलेल्या चष्म्यातूनच २०१४ मधील भारताकडे बघत राहिला. भारताला २०१४ मध्ये आणून ठेवण्यात काँग्रेस पक्षाच्या धोरणाचेच कर्तुत्व होते. पण आपण स्वत:च आणलेल्या अमुलाग्र बदलाचा परिणाम म्हणून भारतामधेच एक स्वतंत्र भारत तयार झाला आहे हे ओळखण्यात काँग्रेस पक्ष कमी पडत होता. आणि ह्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक महत्वाकांक्षेला कुरवाळनारा कुणीच भेटत नव्हता. तो मसीहा मोदींच्या रूपाने भेटला. हा स्वतंत्र भारत म्हणजेच उच्च मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय तसेच भारताबाहेर राहून भारतावर अतोनात प्रेम करणारा आणि अमेरिकेत आहे तसेच भारतात का होऊ शकत नाही असे प्रश्न तिथेच राहून उपस्थीत करणारा समाज. ह्या समाजाचा जन्म मनमोहन सिंगाच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे. भारतात राहून शिकलेला, नोकरीची संधी मिळालेला, आपल्या बापाला जेवढा फंडाचा पहिला हप्ता मिळाला होता तेवढा मासिक पगार घेणारा, आपल्या बापाने वर्षभर घाम गाळून पिके आडतिला घालून वर्षात येणार्या पट्टी एवढाच मासिक पगार घेणारा समाज आहे. जुन्या आणि उच्च मध्यमवर्गीयात नवमध्यम वर्गीय समाविष्ट होताना नवमध्यमवर्गीयांना आमची प्रगती झाली आणि आम्ही तुमच्यातीलंच आहोत हे सिद्ध करण्यासाठी जुन्या गोष्टीना शिव्या द्याव्या लागतात. त्यातील एक होती काँग्रेस. वर्षानुवर्षे निर्णयप्रक्रियेत आम्हाला स्थान नाही हि अढी मनात बाळगून असलेला शहरी मध्यमवर्गीय, व्यापारी वर्ग हा एकवटून मोदींच्या मागे उभा राहिला आणि राजकारणात आणि निर्णयप्रक्रियेत स्वताचे स्थान शोधू लागला. ह्या समाजाला त्यांचे प्रतिनिधित्व मोदी करत आहेत ह्याची खात्री पटली होती. त्यामुळे काधीनव्हे तो हा समाज या निवड्णुकित सक्रीय होता. राजकारणाविषयी ब्र न काढणारा गुजराती, मारवाडी समाज देशभर मोदीचा प्रचार करताना दिसला.

अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया पर्यंत झालेल्या मोदींच्या सभेतून आपल्याल एक गोष्ट सहज लक्षात येईल ती म्हणजे मोदींनी या भारताच्या तीस कोटी मतदारावर केलेली जादू. सत्ता प्राप्ती नंतर दोनच महिन्यात मोदी ह्या सभांमध्ये म्हणतात "मैने ये करके दिखाया " आणि समोर बसलेलि उच्चविद्या विभूषित मेंढरे चेकाळून चीरकू लागतात, उठून नाचू लागतात आणि जिंदाबाद जिंदाबाद म्हणून ओरडू लागतात. पण त्यावेळी ते विसरलेली असतात कि त्यांना तिथे पोहोचवण्यात कॉंग्रेसच्या धोरणाचा किती मोठ वाटा आहे. उदारीकरण आणि खुले आर्थिक धोरण स्वीकारताना तत्कालीन भाजपची भूमिका काय होती हे त्यांना माहीतच नसते.   पण एकदा जादू झाली कि तिथे सुशिक्षित, अशिक्षित, शहाणे, वेडे असा काही फरक राहत नाही. ती सगळी जनता पिपाणिवाल्याच्या मागे जाऊ लागते. 

"हिंदुस्थान में दुनिया का नेतृत्व करनेकी क्षमता है" ह्या वाक्या नंतर होणाऱ्या टाळ्यांच्या कडकडात भारतातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा, दलितांचा आक्रोश दबून गेलेला असतो. पंतप्रधानांच्या  ह्या अश्या घोषणावरून सरकारच्या प्राथमिकता दिसून येतात. भारताच्या खऱ्या गरजा  झाकून ठेवून लोकांना स्वप्ने दाखवणे काही विशिष्ट लोकांची स्वप्ने पूर्ण झाली कि त्यांचा वापर करून घेणे. "Dream Merchant" "स्वप्नांचा व्यापारी: हि संज्ञा मोदींना तंतोतंत लागू पडते. आजच्या शरद पवारांच्या भाषणात मध्यम वर्गीयावर लक्ष द्या आणि त्यांचा विश्वास जिंकायचा प्रयत्न करा हा संदेश आहे.  हा धोरणात्मक निर्णय घ्यायला ह्या समाजाने सर्वच पक्षांना मजबूर केले आहे. ह्या निवडणुकीत ह्याच व्हाइट कॉलर समाजाच्या पाठीमागे बाकी समाज फरफटत गेला होता पण पुढची लढाई हि काँग्रेस विरुद्ध भाजप असेल कि ते सांगता येत नाही पण मध्यमवर्ग विरुद्ध मागास, शेतकरी वर्ग अशी नक्कीच असणार आहे. 




No comments:

Post a Comment