Tuesday, December 13, 2016

नोकरीच्या मुलाखती आणि ....

कंपनी मधे इंटरव्हुव घेताना  कधी कधी खूप निराशा येते. अगदी एखाद्याला येड्या भोकाच्या तू MBA केलंय तू engineering केलंय तुला  चार शब्द नीट बोलता येत नाही कशाला आलारे नोकरी मागायला? असं म्हणून हाकलून  लावू  वाटते. आणि हि मंडळी बहुतकरून ग्रामीण अथवा  निमशहरी पार्श्वभूमी असणारी असतात. त्यानं  सांगावे  वाटते , अशी नोकरी बघ, असे बोल, तसल्या कंपनीत जाताना मुलाखतीची तयारी अशी कर, पण कंपनी कडून मुलाखत घेणारा म्हणून काही मर्यादा असतात.

मग मी  माझ्या भूतकाळात जातो, मला या क्षेत्रात पहिला ब्रेक मिळाला तेव्हा माझी मुलाखत जर तोंडीपण झाली असती तर मला ह्या क्षेत्रात कधीच प्रवेश मिळाला नसता. फक्त लेखीवर मला ऑफर लेटर दिले होते. पण त्या Investment Banking नावाच्या क्षेत्रात ज्ञान तर महत्वाचे असतेच पण तुमचे राहणीमान, तुमचे बोलणे, वागणे, कपडे घालणे , टेबल म्यानर्स ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात. त्याच्याशी मला जुळवून घ्यायला खूप वेळ लागला किंवा कधी कधी माझ्यातला बंडखोर बाहेर येऊन मी मुद्दाम गाबाळ्यासारखे कपडे घालून ऑफिसला जातो.

नवीन नवीन जॉईन झाल्यावर ऑफिसमधील काही मंडळी माझ्याकडे हा गावाकडचा गबाळा पोरगा Investment banking कंपनीत कसाकाय म्हणून माझ्याकडे अतिशय गरीब नजरेने बघायचे. आणि त्या नजरेने बघण्यामधे मुलींची संख्या जास्त असायची.म्हणजे अगदी उस्मानाबाद जिल्ह्यातील नागोबाचीवाडी गावातून आलेली मुलगी असली काय आणि मुंबईच्या अगदी कफ परेड मध्ये राहणारी मुलगी असली काय माझ्याकडे त्या तितक्याच तुछ्तेणे बघायच्या.

मग काही कामासाठी आल्या समजायचं "च्या मायला हि येवढा उंच टाचेचा स्यांडल घालून , केस झकास फिरवून मागे टाकून मला कॉम्प्लेक्स देत्तीय पण हिला तर "GDP" आणि "GNP" मधला फरक पण कळत नाही. हे नुसतंच " झगा झगा झगा आणि मला बघा मला बघा" आहे. असे काही घडले कि माझा आत्मविश्वास वाढायचा.

पण याचा अर्थ तुमच्याकडे ज्ञान असले म्हणून तुम्ही केपण गबाळे रहा होत नाही.ज्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचा डेकोरम पाळला पाहिजे.

सात वर्षापूर्वी पहिल्यांदाच बॉसने मला एक खूप मोठ्या कंपनीच्या मिटिंगला नेले. भारतीय कंपनीचा चेअरमन ज दोन तीन हजार करोडचा मालक आहे आणि परदेशी कंपनीचा चेरमन त्याहून मोठी कंपनी सांभाळतो. ह्या मिटिंग मधे बोसने माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि मला समजले माझे कपडे त्या मिटींगच्या योग्यतेचे नव्हते. दुसऱ्या दिवशी बॉसने मला मॉल मध्ये घेऊन जाऊन दोन कोट, तीन शर्ट, आणि दोन trousers गेऊन दिले. तेव्हापासून मी बाहेर कसे का असेना ऑफिस मध्ये मी एक Investment Banker च असतो.

तर सांगायचा मुद्दा हा आहे कि ग्रामिन्न आणि निमशहरी भागातून येणाऱ्या मुलांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कंपनी मध्ये काम करण्यासाठी पुस्तकी ज्ञान तर असतेच पण ज्या Soft Skills and Essential Skills लागतात त्याचा अभाव असतो. म्हणून ते शहरी मुला पेक्षा करियर मध्ये तीन चार वर्ष मागे चालत असतात. तो आत्मविश्वास मिळवायला ग्रामिन् मुलांची तीन चार वर्ष निघून जातात.

अशा ग्रामीण आणि निमशहरी मुलासाठी Soft skills as well as essential skill देणारी एकही संस्था मला ग्रामीण भागात दिसत नाही. म्हणजे डिग्री पूर्ण होत असतानाचा असा एक कोर्स जो विद्यार्थ्यांना शहरात कसे वागावे, मुलाखतीला तोंड कसे द्यावे यापासून,ऑफिसमधे कसे वागावे, प्रेजेन्तेशन कशी द्यावीत, जेवण कसे करावे, केस कसे कापावेत, लेखी भाषा कशी असावी, इमेल कसे लिहावेत, इमेलची  भाषा अशी असावी इत्यादी गोष्टीचे ट्रेनिंग देणारी एकही संस्था मला , कोल्हापूर, लातूर, नगर, मराठवाडा भागात आढळत नाही.

अशी ट्रेनिंग संस्था काढण्यासाठी कुणीतरी कोर्पोरेट मधील अनुभवी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. ज्यामुळे ग्रामीण विध्यार्थ्यांना त्यांचे करियर घडवणे सोपे जाईल तसेच भारताचा ७०% हुमन रिसोर्से  हा स्कीलफुल रिसोर्से होईल .











No comments:

Post a Comment