Friday, January 2, 2015

धर्म आणि राजकारण

धर्म आणि राजकारण ह्यात मी जास्त नाही तर काहीच फरक करत नाही. तर प्रश्न उरतो, तालिबान्यांचा धर्म आणि पाकिस्तानी लोकांचा धर्म वेगळा आहे का ? तर उत्तर आहे "हो वेगळा आहे " . आमचाच धर्म खरा चे पुढचे पाऊल असते आम्ही म्हणतो तोच धर्म खरा. आणि ह्यामध्ये लपलेली असते सत्ता. कारण कोणताही धर्म हि वैयक्तिक गोष्ट कधीच नसते. ती सामुहिक गोष्ट असते. आणि जिथे समूह येतो तिथे राजकारण आणि सत्ताकारण आलेच पाहिजे. मानवी इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण युद्धाशिवाय शक्य झालेले नाही.
कमजोर शत्रू जास्त धोकादायक असतो. एकदा युद्ध म्हटल्यानंतर त्यामध्ये कायदे, विधिनिषेध, दया, माया ह्याची अपेक्षा ठेवू नये.

आमच्या कुटुंबाना पाकिस्तान सरकार नाहक त्रास देत असल्याने आम्हाला ते पाउल उचलावे लागले हा तालिबान्यांचा युक्तिवाद. त्यांना हा युक्तिवाद करण्याची गरज पडली कारण पाकिस्तानी कट्टर मुस्लिम जनतेच्या पाठिंब्याची गरज त्यांना पण आहे. कोणतेही युद्ध फक्त देशाचे किंवा अतिरेक्यांचे नसते तर ते जनतेचे असते. अतिरेक्यांच्या बाबतीत त्यांना छुपा वा उघड पाठींबा असणाऱ्या जनतेचे असते. तसे नसते तर तालिबान्यांना युक्तिवाद करण्याची गरज पण पडली नसती. खलीस्तानचा लढा अयशस्वी करण्यात तत्कालीन भारत सरकार (इंदिरा गांधी ) ह्यांची एक उपाय योजना खूप कामी आली होती. जे कुणी अतिरेकी झाले आहेत किंवा गायब झाले आहेत त्यांच्या कुटुंबाना अटक केले जायचे किंवा त्रास दिला जायचा. जेणेकरून अतिरेकी कौटुंबिक आघाडीवर हारून हत्यार टाकून पुन्हा "देशप्रेमी" बनतील . हा उपाय कामी पण आला होता. पण खलिस्तानी आणि तालीबाण्यात मुलभूत फरक असावा. उद्या तालिबानी "अल्लाच्या मर्जीनेच मानवी जातीच्या कल्याणासाठी आम्हाला ते काम करावे लागले" असे सुद्धा म्हणतील. मी असल्या गोष्टीचा निषेध वैगेरे करत नाही. कारण त्यामुळे काहीच फारक पडत नसतो. ह्या गोष्टी घडत आल्या आहेत आणि पुढे पण घडत राहतील. आपण फक्त कामी आलेल्या मुलासाठी अन त्यांच्या पलकासांठी हळहळ व्यक्त करू शकतो. शेवटी प्रत्येक जीवाने न्यायाची अपेक्षा करायला ह्या जगाची उत्पत्ती काय न्याय तत्वावर झालेली नाही.





No comments:

Post a Comment