Tuesday, December 13, 2016

आर्थिक देशीवाद

शहरे अंगावर घेणे आणि यशस्वी होणे हि लोकांची तत्कालीन गरज आहे. तो काय भारतासमोर ओ करून उभ्या राहिलेल्या गरिबी, शहरीकरण, प्रदूषण, बकालीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मजुरांची पिळवणूक आणि शेवटी जातीयवाद यावरचा उपाय असूच शकत नाही. 

आपण म्याक्रो लेेवलला जर विचार केला तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारल्या शिवाय भारत आणि भारतातील लोकांचा विकास होऊ शकणार नाही. सगळेच ग्रामीण भागातले लोक जर गावगाड्यात स्थान नसलेल्या आणि गावगाड्यात सर्वोच्च स्थान असलेल्या आयतखाऊ जातींनीसमूहांनी शहरात येऊन आपल्या तथाकथित वोळखी निर्माण केल्या म्हणून गावं सोडून शहरे अंगावर घ्यायला चालू केली तर शहरात रहायला सोडा उभे राहायला जागा मिळणार नाही. 

जेंव्हा नेमाडे  एक देशीवादी  म्हणून विचार करतात  तेव्हा  फक्त  चांगदेव  काय  म्हणतो हे  विचारात न घेता पांडुरंग काय  म्हणतो, खंडेराव काय म्हणतो याचा विचार तर करावाच  लागेल  पण स्वतः  नेमाडे देशीवादाविषयी  काय  बोलतात  याचा पण विचार करावा  लागेल. 

नेमाडे जेव्हा देशीवाद किंवा जुन्या तथाकथित हिंदू संकृतीचे गोडवे गातात तेव्हा त्यांना या संस्कृती मध्ये अगदी जैन- बुद्ध काळापासून ते आजपर्यंतची संस्कृती अभिप्रेत असते. समाजासाठी एक उत्कृष्ट आर्थिकसामाजिकराजकीय व्यवस्था देण्यासाठी आपल्याला पाश्च्यात्य भांडवलशाही जिने आता Crony colonialism चे रूप घेतलेले आहे ती परवडणारी नाही तसेच ती १३० कोटी लोकांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकत पण तिच्यात नाही. आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला आपल्या संस्कृतीत आपल्या परंपराधे सापडतील. जे वाईट आहे ते सोडून जे चांगले आहे ते टिकवून, त्याच्यात काळानुरूप बदल करून, भारताच्या सर्व समजला न्याय देणारी संस्कृती उभे केली जाऊ शकते, हा आशावाद देशीवादा मधे आहे. हा भाबडा आशावाद आहे का? आपण खूप पुढे निघून आलोय का ? उदारीकरणाने आपले मागे फिरायचे दरवाजे बंद केलेत का ? तर माझे उत्तर आहे "नाही" उदारीकरणाच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी उदारीकरण सोडून न देता आपल्याल हवे तसे वापरून आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून एक नवा समृद्ध देश, समाज निर्माण  करू शकतो. तोच देशीवाद. स्वतःच्या भाषेत लिहिणे, स्वतःच्या भाषेत बोलणे, स्वतच्या भाषेत व्यापार करणे हा देशीवाद उदारीकारनाच्या ह्या जगत  सुद्धा अनेक युरोपियन आणि पौर्वात्य देश टिकवून आहेत. (असो तो मुद्दा वेगळाय)

आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याच  मातीत सापडतील म्हटले कि म्हटले कि लगेचच "मग जातीवादा विषयी आपले काय मत आहे हा एकंच धोशा सुरु होऊन "मुर्दाबाद - मुर्दाबाद" च्या घोषणा देण्या ऐवजीदेशीवाद म्हणजे जातीयवाद नाही हे समजण्याचा प्रयत्न करावा. नाही केला तरी हरकत नाही. किंवा तुम्ही गावे सोडल्या नंतर जातीयवाद नष्ट झाला का आणि ज्यांनी अगोदर गावे सोडली त्यांनी प्रगती केली हे गृहीतक जरी मान्य केले तरी आता उशिराने पांडुरंग चांगदेव खंडेराव यानी गावे सोडायला चालू केले तर तोच खेड्यातील जातीयवाद शहरात एका वेगळ्या रुपात वावरणार नाही कशावरून?

छोटे  लोक स्वतः साठी , स्वतःच्या जातीसाठी, मातृभाषिक लोकासाठी उत्तरे शोधत असतात, मोठी माणसं पूर्ण समाजासाठी उत्तरे शोधत असतात. ज्यांनी कुणी गावे सोडून शहरे अंगावर घेतली त्यांचे अभिनंदन  आहे, त्यांच्या पुढे तोच पर्याय होता पण तोच पर्यार सगळ्या पुढे  आणून सोडणे आणि सगळ्यांना आव्हान देणे कि आता तू पण गाव सोड आणि मोठा होऊन दाखव हे प्रश्नाचे तत्कालीन समाधान  शोधने आहे ह्याने संपूर्ण समाजाला दिशा मिळणार  नाही  परंतु  समाजापुढे  आणखी  कठीण  प्रश्न  तेवढे  निर्माण  करून ठेवील .  








नोकरीच्या मुलाखती आणि ....

कंपनी मधे इंटरव्हुव घेताना  कधी कधी खूप निराशा येते. अगदी एखाद्याला येड्या भोकाच्या तू MBA केलंय तू engineering केलंय तुला  चार शब्द नीट बोलता येत नाही कशाला आलारे नोकरी मागायला? असं म्हणून हाकलून  लावू  वाटते. आणि हि मंडळी बहुतकरून ग्रामीण अथवा  निमशहरी पार्श्वभूमी असणारी असतात. त्यानं  सांगावे  वाटते , अशी नोकरी बघ, असे बोल, तसल्या कंपनीत जाताना मुलाखतीची तयारी अशी कर, पण कंपनी कडून मुलाखत घेणारा म्हणून काही मर्यादा असतात.

मग मी  माझ्या भूतकाळात जातो, मला या क्षेत्रात पहिला ब्रेक मिळाला तेव्हा माझी मुलाखत जर तोंडीपण झाली असती तर मला ह्या क्षेत्रात कधीच प्रवेश मिळाला नसता. फक्त लेखीवर मला ऑफर लेटर दिले होते. पण त्या Investment Banking नावाच्या क्षेत्रात ज्ञान तर महत्वाचे असतेच पण तुमचे राहणीमान, तुमचे बोलणे, वागणे, कपडे घालणे , टेबल म्यानर्स ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात. त्याच्याशी मला जुळवून घ्यायला खूप वेळ लागला किंवा कधी कधी माझ्यातला बंडखोर बाहेर येऊन मी मुद्दाम गाबाळ्यासारखे कपडे घालून ऑफिसला जातो.

नवीन नवीन जॉईन झाल्यावर ऑफिसमधील काही मंडळी माझ्याकडे हा गावाकडचा गबाळा पोरगा Investment banking कंपनीत कसाकाय म्हणून माझ्याकडे अतिशय गरीब नजरेने बघायचे. आणि त्या नजरेने बघण्यामधे मुलींची संख्या जास्त असायची.म्हणजे अगदी उस्मानाबाद जिल्ह्यातील नागोबाचीवाडी गावातून आलेली मुलगी असली काय आणि मुंबईच्या अगदी कफ परेड मध्ये राहणारी मुलगी असली काय माझ्याकडे त्या तितक्याच तुछ्तेणे बघायच्या.

मग काही कामासाठी आल्या समजायचं "च्या मायला हि येवढा उंच टाचेचा स्यांडल घालून , केस झकास फिरवून मागे टाकून मला कॉम्प्लेक्स देत्तीय पण हिला तर "GDP" आणि "GNP" मधला फरक पण कळत नाही. हे नुसतंच " झगा झगा झगा आणि मला बघा मला बघा" आहे. असे काही घडले कि माझा आत्मविश्वास वाढायचा.

पण याचा अर्थ तुमच्याकडे ज्ञान असले म्हणून तुम्ही केपण गबाळे रहा होत नाही.ज्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचा डेकोरम पाळला पाहिजे.

सात वर्षापूर्वी पहिल्यांदाच बॉसने मला एक खूप मोठ्या कंपनीच्या मिटिंगला नेले. भारतीय कंपनीचा चेअरमन ज दोन तीन हजार करोडचा मालक आहे आणि परदेशी कंपनीचा चेरमन त्याहून मोठी कंपनी सांभाळतो. ह्या मिटिंग मधे बोसने माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि मला समजले माझे कपडे त्या मिटींगच्या योग्यतेचे नव्हते. दुसऱ्या दिवशी बॉसने मला मॉल मध्ये घेऊन जाऊन दोन कोट, तीन शर्ट, आणि दोन trousers गेऊन दिले. तेव्हापासून मी बाहेर कसे का असेना ऑफिस मध्ये मी एक Investment Banker च असतो.

तर सांगायचा मुद्दा हा आहे कि ग्रामिन्न आणि निमशहरी भागातून येणाऱ्या मुलांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कंपनी मध्ये काम करण्यासाठी पुस्तकी ज्ञान तर असतेच पण ज्या Soft Skills and Essential Skills लागतात त्याचा अभाव असतो. म्हणून ते शहरी मुला पेक्षा करियर मध्ये तीन चार वर्ष मागे चालत असतात. तो आत्मविश्वास मिळवायला ग्रामिन् मुलांची तीन चार वर्ष निघून जातात.

अशा ग्रामीण आणि निमशहरी मुलासाठी Soft skills as well as essential skill देणारी एकही संस्था मला ग्रामीण भागात दिसत नाही. म्हणजे डिग्री पूर्ण होत असतानाचा असा एक कोर्स जो विद्यार्थ्यांना शहरात कसे वागावे, मुलाखतीला तोंड कसे द्यावे यापासून,ऑफिसमधे कसे वागावे, प्रेजेन्तेशन कशी द्यावीत, जेवण कसे करावे, केस कसे कापावेत, लेखी भाषा कशी असावी, इमेल कसे लिहावेत, इमेलची  भाषा अशी असावी इत्यादी गोष्टीचे ट्रेनिंग देणारी एकही संस्था मला , कोल्हापूर, लातूर, नगर, मराठवाडा भागात आढळत नाही.

अशी ट्रेनिंग संस्था काढण्यासाठी कुणीतरी कोर्पोरेट मधील अनुभवी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. ज्यामुळे ग्रामीण विध्यार्थ्यांना त्यांचे करियर घडवणे सोपे जाईल तसेच भारताचा ७०% हुमन रिसोर्से  हा स्कीलफुल रिसोर्से होईल .











रॉश कुटुंब आणि हायकिंग

रॉशने त्याच्या थकून गेलेल्या पायाला जरा आराम दिला आणि लडखडत उभा राहत दूर दूर पर्यंत बघू लागला. त्याला कोसो दूरपर्यंत फक्त छोटी खुरटी झुडपे आणि उन्हाने तापलेले राखाडी खर्डे पिवळे डोंगर दिसत होते. त्याने पाठीमागे वळून बघितले. त्याची  पत्नी ख्रिस्टीन बरीच मागे पडली होती आणि ती पण लडखडत लडखडत चालत रॉशच्या मागे यायचा प्रयत्न करत होती. तिच्या पुढेच चालत असलेला त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा रॉनी रॉशजवळ पोचला आणि त्याच्या पप्पाच्या पायात त्याने आपलं अंग बोच्यावर आपटून दिलं.  रॉशला समजले होते कि आता रॉनी  मध्ये चालायची ताकत उरलेली नाही पण तो स्वतः पण रॉनीला उचलून घ्यायच्या स्थितीत नव्हता. ख्रिस्टीन, रॉनि  पर्यंत तरी चालू शकते कि नाही असे झाले होते पण कशीबशी आली आणि ती पण  त्या तापलेल्या मातीमिश्रीत खडकावर बसली. रॉनीने स्वतःकडील वाटर ब्याग काढली मुलाला दोन घोट दिले आणि स्वतः एक घोट आणि बायकोला एक घोट पाजून थोडी तहान भागवण्याचा प्रयत्न केला.

"पप्पा कधी येणार घर, कुठे आहे हायवे, कधी पोचणार आपण, मला आजून पाणी पाहिजे " असं स्वतःशीच पुटपुटनाऱ्या पोराला जवळ घेतलं त्याच्या केसात हात फिरवला त्याच्या डोक्याची पप्पी घेतली आणि त्याच्या मनात विचार आला, "हा माझा पोरगा आणि त्याच्या केसाचा सुगंध मी असंच आजून यापुढे पण घेऊन शकेल का  ?" आता डोळ्यातून येण्यास्स्ठी सुद्धा शरीरात पाणी उरले नव्हते. ह्या वाळवंटातून आपण सुखरूप बाहेर पोहचू कि नाही याबाबत आता रॉशचा आत्मविश्वास कमी होत चालला  होता. शेकडो किलोमीटर पसरलेले ते नेवाडाचे वाळवंट आपल्याला खाऊन टाकणार असं त्याला वाटलं पण त्याने धीर सोडला नव्हता.

आता त्यांच्याकडील, मोबाईल, क्यामेरा यांची ब्याटरी पण संपून गेली होती आणि दळणवळनाचे कोणतेही साधन आता त्यांच्याकड उरले नव्हते. रॉशने बायकोला धीर दिला आणि चला हि समोरची टेकडी गेली कि लगेच हायवे आहे म्हणून त्यांना उठवून चालू लागला. त्या दूरदूर पर्यंत फक्त उन्हाच्या झळया आणि मृगजळ दिसणाऱ्या वाळवंटात आपले संपूर्ण कुटुंब तडफडून मरताना बघायाची शिक्षा आपल्यालाच देवाने का दिली असेल अशी गोष्ट रॉशच्या मनात आली. ख्रिस्टीन मध्ये आता तिच्या मुलाला जवळ घेण्याची ताकत पण उरली नव्हती.

भूक, तहान आणि चाळीस अंश सेल्सियस तापमानात खालून गरम वरतून आग ओकणारा सूर्य, अशा भट्टीतून पुढे कसलीही आशा नसताना हे तिघे चालण्याचा प्रयत्न करत होते. उरलेल्या पाण्याचे दोन घोट रॉनीला आणि एक एक घोट आई बाप घेत होते, ते पाणी पण आता संपले होते. मृत्यूची भीती माणसा मध्ये एक वेगळीच ताकत निर्माण करते असे म्हणतात त्याप्रमाणे आता भान गेलेल्या अवस्थेत ते तिघे त्या वाळवंटात चालत होते. आता त्या तिघामध्ये खूप अंतर पण वाढले होते आणि कुणामधेही दुसऱ्याकडे लक्ष देण्याची क्षमता उरली नव्हती.

अशा वेळी जगत सर्वात महत्वाचे काय तर डोक्यावर छप्पर, आपले घर असे रॉनीच्या मनात आले आणि आपण कशाला उगीच हायकिंगला आलो आणि आलो तरी आपल्या मुलाला पण मरायला बरोबर आणले याचा त्याला खूप पश्चाताप होत होता.

तेवढ्यात त्याने  पूर्वेकडे बघितले तर अचानक ढग दाटून आलेले त्याला दिसले आणि क्षणार्धात सोसाट्याच्या वार्याने तो आसमंत व्यापून टाकला. भल्या मोठ्याढगांनी त्या संपूर्ण वाळवंटाला व्यापून टाकले एक क्षणात नव्हत्याचे होते केले. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. निसर्ग एका क्षणात संपूर्ण डावच पलटून टाकू शकतो हे रॉशच्या कुटुंबाने याची देही याची डोळा पहिले. पावसातून समोरून येणारी फोरेस्ट विभागाची जीप बघून देवाने सगळ्या चाली आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी खेळल्या आहेत आसे रॉशला वाटले.

त्या  वाळवंटाच्या आठवणीत, आता रॉश मस्त घरातील शॉवरखाली रॉनीला घेऊन बसला आहे आणि अचानक ख्रिस्टीन पण येऊन त्यांना शॉवरखाली सामील होऊन ते तिघे त्या वाळवंटाचा बदला घेत होते.

........................................................................................................................................................

ह्या तिघांच्या शोधात निघालेल्या फोरेस्ट ऑफिसर्सना ह्या तिघांचे देह काही अंतरावर पडलेले दिसले. त्यानि असा अंदाज केला कि पाण्यावाचून हे लोक मरण्याआधी भ्रमिष्ट झाले होते आणि त्यांनी कसेही इस्तंतः फिरत फिरत आपले देह टाकून दिले.रॉशच्या देहापासून ख्रिस्टीन जवळ जवळ शंभर मीटर अंतरावर पडली होती, आणि रॉनी जरासा जवळ म्हणजे पन्नास मीटर अंतरावर पडलेला होता.

फोरेस्ट ऑफिसर्सना रॉनी जिवंत आढळला, आई बापांनी एक एक घोट पिऊन लेकराला दोन दोन घोट देत राहिल्यामुळे तो वाचला असावा. रॉनीचे आईबाप त्या ट्रेकिंग ने आणि नेवाडाच्या वाळवंटाने खाल्ले. असे अनेक लोकांना खाल्ले  आहे  आतापर्यंत नेवाडाच्या वाळवंटाने.