Wednesday, May 14, 2014

बुद्धा


संवेदनशील तर सगळेच असतात. कुणी कमी कुणी जास्त. भोवताली घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा स्थळ, काळ, आणि मनुष्याच्या स्वभावानुसार बदलतो. भोवतालच्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित घटनांचा प्रभाव सर्व लोकावर सारखाच पडतो असे नाही. काही लोकांना अतिशय शुल्लक वाटणारी घटना काही लोकांचे आयुष्यच बदलू शकते. अश्या अनेक घटणांचे संवेदनशिलतेने निरीक्षण करून मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी किती लोक प्रयत्न करतात?  ज्याच्याकडे काहीच नाही किंवा जो पराभूत आहे त्याने केलेल्या त्यागाला तेवढी उंची प्राप्त होवू शकत नाही. पण ज्याच्याकडे सर्व काही आहे किंवा ज्याला अजून पराभवच माहित नाही अश्या माणसाने केलेल्या त्यागाला एक वलय, उंची प्राप्त होते. जग त्या त्यागाकडे एक आदर्श त्याग म्हणून पाहते.

साधारण दोन हजार सहाशे वर्षापूर्वी असाच लहाणपणापासून संवेदनशील असलेला एकोणतीस वर्षाचा राजपुत्र आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे विचलीत होतो. आणि मनात उठलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी घर, बायको, मुलगा, राज्य, अधिकार सगळे सोडून सत्याच्या शोधात जातो.  त्याचा हा त्याग अखिल मानव जातीच्या कल्याणसाठी होता. स्वताच्या कल्याणासाठी किंवा स्वताला जीवन मुक्तीच्या फेर्यातून मुक्त करून घेण्यासाठी नव्हता. त्यामुळे त्याचा घराचा त्याग हा आदर्शाच ठरतो. त्याकाळी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक मार्गावर चालून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न तो करतो.प्रत्येक मार्गातून त्याला काहीतरी मिळतेच पण ज्या गोष्टीच्या शोधात तो वणवण फिरतोय तीच गोष्ट अजून मिळालेली नाही याची जाणीव पदोपदी होतेय. त्याने  केलेल्या गुरूच्या माध्यमातून आत्मसात केलेल्या ज्ञानातून काही उत्तरे तर मिळतात पण अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात किंवा राजकुमाराचे समाधान होत नाही. आपण ज्या गुरूच्या माध्यमातून अपेक्षित उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत तिथे अपले समाधान होन्याचि शक्यता नाहि हे दिसताच तिथुन तो नविन मार्गाच्या शोधात निघतो. तात्कालीन सत्य शोधन्याच्या मार्गात स्वताच्या शरिराल त्रास करुन घेने, उपाशि राहने अश्या अनेक गोष्टींचा समावेश होता. एक वेळ तर आशी येते कि जो पर्यन्त ज्ञान प्राप्त होत नाहि तोपर्यन्त अन्न ग्रहन करणार नाहि असे ठरवुन हा राजकुमार ध्यान लावुन बसतो. मरणासन्न अवस्थेत असलेल्य ह्या साधुला एक मुलगि पहाते आणि दुध आणि गव्हाचि खिर देते. तो राजाकुमार खिर खातो अणि आपला खुप दिवसाचा उपवास सोड्तो. ती सुजाता. ती नसती तर हे जग तथागथाला मुकले असते का हा प्रश्न मला नेहमी पडतो. आश्या अणेक खड्तर प्रवासातुन मार्गक्रमन केल्यानंतर  ह्या राजकुमाराला ज्ञान प्राप्त होते व ते ज्ञान तो जगाच्या कल्यासाठी  लोकाना देत आयुष्य कामी लावतो.

संत तर खूप असतात पण गौतम बुद्ध हे मानवि इतिहासातिल एक मैलाचा दगड आहेत. ते स्वयन्भु आहेत त्यांचा कुणीही गुरु नाहि. त्यांनी मिळवलेले ज्ञान हे सरस्वी त्यांचेच आहे आणि ते लोकाना देवुन लोकांचे  जगने सुसह्य करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे जग त्यांचे कायम ऋणी राहील.  आस्तिक माणसाला देवळात घेवून जाण्याचे काम तर कुणीही करीन पण नास्तिक माणसाला सुद्धा देवळाकडे घेवून जाण्याचे काम त्यांनी केले. प्रस्थापीथ ज्ञानाला नाकारून सर्व समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढण्याचे काम बुद्धाने केले. ज्या काळी यज्ञ हि संकल्पना समाजातत अश्या तर्हेने रुजली होती कि त्याच्या खर्चामुळे तत्कालीन सामान्य जनताच नाही तर राजे राजवाडे यांचे सुद्धा दिवाळे निघत होते. त्याकाळी सामान्य जनताच फक्त आपला प्रसाद देवांपर्यंत पोहचवण्यासाठी  ब्राह्मणावर अवलंबून नव्हती तर देवांना सुद्धा भक्ताकडून प्रसाद घेण्यासाठी ब्राह्मणावर अवलंबून राहावे लागते असा समज समाजात रूढ झाला होता. त्यामुळे देव आणि समाज दोघे पण ब्राह्मणावर अवलंबून असल्यामुळे ब्राह्मणांचे महत्व समाजात देवा पेक्षा जास्त वाढले होते. ह्या यज्ञांच्या मुळावर घाव घालून समाजाला एकप्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम गौतम बुद्धाने केले.

सिद्धार्थ गौतमला ज्ञानाच्या शोधातील प्रवासामध्ये ज्या अडचणी आल्या जी संकटे आली किंवा आणली गेली ती मारा नावाच्या एका काल्पनिक व्यक्तिमत्वाने. हे मारा नावाचे काल्पनिक घटक सर्व लोकांच्या मध्ये किंवा आसपास असततात आणि माणसाला त्याचे इप्सित सध्या करण्यापासून रोखत असतात. अश्या मारांच्या तावडीतून सुटण्यासाठी गौतम बुद्धाची शिकवण मानवी समाजाला कायम साथ देईल. सिद्धार्थ  गौतमला मार्गदर्शन करण्यासाठी कुणीच नव्हते, त्याला त्याचा मार्ग स्वताच शोधावा लागला आणि स्वताच स्वताच्या मनातील नकारार्थी भावनावर विजय मिळवावा लागला. त्याला ते शक्य होवू शकले. सर्व मानवजातीला ते शक्य होणे नाही. पण आज माणसापुढे तथागातना सापडेलला आणि त्यांनी अखिल मानव जातीला शिकवलेला मार्ग आहे. तो जरी मानव जातीने पत्करून त्यावरून मार्गक्रमण केले तरी जगातील दुःख आणि भीती संपून जायला किंवा कमीत कमी कमी व्हायला मदत होईल.

बुद्धं शरणं गाछ्यामि !



Thursday, May 8, 2014

कैलाश पर्वत आणि पर्वतारोहण



एका शतकापुर्वी कैलाश पर्वता विषयी अनेक रहस्य उलगडलेली नव्हती. पवित्र समजला जाणारा पर्वत बाहेरील जगासाठी एक अख्याइकाच होता. चीनच्या विस्तीर्ण पसरलेल्या प्रदेश्याच्या आणि भारतीय उपखंडाच्या मध्ये प्रतिबंधित साम्राज्य तिबेटच्या पठारावर हा पर्वत लपलेला आहे असा फक्त समज होता. या पर्वताची उंची ६६५८ मीटर आहे. ब्रह्मपुत्रा, सतलज आणि सिंधू या तीन दक्षिण आशिया मधील महत्वाच्या नद्यांचा उगम कैलाश पर्वत रंगामध्ये आहे.  तिबेट मध्ये या पर्वताला "गंग्कर ती से" म्हणजेच "बर्फाचा पवित्र पर्वत" या नावाने ओळखले जातो. हा पर्वत फक्त बुद्ध धर्मासाठीच नाही तर हिंदू, जैन धर्मासाठी आणि इतर अनेक पंथासाठी सुद्धा पवित्र समाजला जातो. १९३० साली इटलीच्या टुसि या तिबेटोलोजिस्टने या पर्वताला जगाची "नाभी" अशी उपमा दिली होती, तो असे पण म्हणाला होता कि हा पर्वत म्हणजे पृथ्वीवासियांना देव लोकांपर्यंत पोहचवणारी शिडी आहे आणि यावरील चमकणाऱ्या राजवाड्यात ३६० देव वास करतात. ह्या पर्वताच्या धार्मिक अधिष्ठाना मुळे याच्यावर अजून कुणीही पर्वतारोहण केलेले नाही किंवा यावर  कुणीही चढलेले नाही. रेन्होल्ड मेस्नेर या इटालियन पर्वतारोहीला १९८४ मध्ये पर्वताच्या कडेकडेने फिरायची परवानगी मिळाली होती पण त्याने पर्वतावर चढाई केली नाही किवा वरती चढून प्रदक्षिणा पण घातली नाही. कारण पर्वतारोहिनीच ह्या पर्वतावर न चढण्याची परंपरा पाळली होती आणि ती रेन्होल्डणे मोडावी असे इतर पर्वतारोहीना वाटत नव्हते. या पर्वतावर चढणे म्हणजे पर्वतात रुपांतरीत झालेल्या देवावर पायात बुट घालू चढल्या सारखे होईल यावर पश्यात्य पर्वतारोहीमध्ये एकमत झाले होते. त्यानंतर अजून कुणालाही परवानगी मिळालेली नाही. २००१ मध्ये जीझस मर्टिनेस नोवास ह्या पर्वतारोहीने चीन सरकारकडे कैलाश वर पर्वतारोहण करण्याची परवानगी मागितली होती, त्याला जगाला तिथून शांततेचा आणि पर्यावरण विषयक संदेश जगाला द्यायचा होता. परंतु त्याच्या ह्या मोहिमेला धार्मिक कारणासाठी चीन, तिबेट आणि भारता  मधून विरोध झालाच पण बाकी गिर्यारोहकांनी पण विरोध केला कारण स्थानिक भावना दुखावून कोणतीही मोहीम करू नये अशी भावना जगातील गिर्यारोहाकामध्ये होती.


Wednesday, May 7, 2014

भूतकाळाच्या मागे पळताना

दिवस मावळायला चीर घोडी, आट्यापाट्या, ब्याट बॉल, इटी दांडू जो कोणता खेळ खेळत असु तो बंद करून घाम्याघूम होवून घरी जायचं. ब्याट बॉल इटी दांडू काय असेल ते खाटाखाली टाकायचं आणि तडक जेवायला. हात धुणे वैगेरे चाळे कधीतरी बापाने एखादी शिवी देवून आठवण करून दिली तरच. नाहीतर पहिले एकदोन घास जास्तच चांगले लागत असावेत. धूळ, घाम वैगेरे. जेवण झाले कि हात्रून पाघ्रून घेवून तडक देवळात, आपल्या आपल्या जागी कापडं टाकून लगेच  देवळामागच्य रहदारी नसलेल्या रस्त्यावर अड्डा मांडायचा. घरी थांबणे म्हणजे अपमान वैगरे वाटत असावा. आपण कितीहि  फास्ट उरकून आलो तरी आपल्या अगोदर तिथं पर्मनंट मेंबरं असायचीच. त्यात चावट, मिट्या, शऱ्या, शांबूळं, पप्या, उम्या इत्यादी इत्यादी हि अनुभवी गाबडी. ह्यांच्या तोंडात गुटका, तंबाकू वैगेरे आणि रस्ता सगळा घान केलेला. अर्र तिथं नकु बसू, तिथं थुक्लोय, अर्र तितंबी…तुमच्या आयला लावला नामा गडदु, जरा लांब थुकायला येत नाही कारं ?

बरं दि तंबाकू........

तू काय जावई लागतो का बे इकत घेत जा कि, म्हनं दि तंबाकू, मिळत नसती!

आबे दिकी आमची म्हतारं म्हातारी खीसं तपास्त्यात म्हणून मागतोय, तुम्हाला काय आई बापानी सुडून दिलंय, बापाकडून तंबाकू मागून खायची टाप हाय तुमची.

घालाय आता तर देतंच नसतो.

बरं धररं, च्यायला इक्याला नाही म्हणायचं मजी अवगडय, आयघाला उद्याच्या म्याचला बोलिंग करणार नाही मग,

इकास उद्या आयघाल्या ह्याट्रिक पाहिजे, नाहीतर पहिली बोलिंग मिळणार नाही……

अश्या तर्हेने चालू व्हायचा चांडाळ चौकडीचा कार्यक्रम. ह्यात कुणी शिकत असलेली, कुणी शिकण्याची याक्टिग करत असलेली तर कुणी शिक्षणात काय राम नाय म्हणून मागं पुढं बघणारी मंडळी. कार्यक्रमाची रूपरेषा तीच असे उद्याच्या क्रिकेट म्याचचे प्ल्यानिंग आणि चाळीवरील लफडी.

तेवढ्यात इट्ठल समोरून येताना थोड्याश्या अंधारात सुद्धा वोळखू यायचा. हा कारखान्यातील हमाल. पायात पुरातन काळी शिवून घेतलेली चप्पल, कधी काळी पांढरी असावी अश्या इजारीची एक बाही गुडग्या पर्यंत आणि एक बाही पाया पर्यंत, हातातल्या रुमालात बांधलेली सहा अंडी, अंगात तीन गुंड्याचा अंगरखा, डोक्यावर तिरकी आणि पडतेय अशी वाटणारी पण कधीच न पडणारी टोपी, आणि रिकाम्या रस्त्यावर दक्षिण उत्तोर जीगज्याग करीत चालणे. एकदा पळत पळत तोल सावरत रस्त्याच्या दक्षिणेला तर लगेच तिकडे जास्त झाले म्हणून तिरकं पळत पळत उत्तरेला, पण रस्ता सोडून खाली गेलेला आणि पिवून पडलेला हा मला कधीच दिसला नाही. हा लांबून येताना दिसला कि आम्ही मंडळी सावरून बसत असू. किमान पंधरा मिनिटे टाईम पास.

कायरे जोक्त्यानो, काम धामं कराकी, आयबापाच्या पोटाला धोंडं झालं असतं तरी परवडलं असतं…

अजून थोडी मजा करायच्या आतच त्याची अतिशय गरीब बायको यायची आणि त्याला हाताला धरून न्यायची. किती जरी प्याला असला तरी बायको समोर एक शब्द नाही, ना बायकोचा त्याला शब्द. थोडा वेळ शांतता.

पण हाच जर इट्टल दुसर्या दिवशी सकाळी कामाला जाताना दिसला तर वोळख पण नाय दाखवणार.

आमच्या समोरच्याच बाजूला मोठ्या माणसांचा मेळा असायचा. कामावरून सुटून जेवण  उरकून उन्हाळ्यातील मस्त पाशिमेकडील वारे खात गप्पा.  त्यात राजकारण हाच मुख्य विषय आणि मुख्य पात्र पण एकंच "पवार साहेब". तारीफ तरी किंवा शिव्या तरी.

कारखान्यावर भरणारे क्रिकेटचे सामने म्हणजे आकर्षण असायचे.  off season  असल्याने कामगारांची सामने पाहायला गर्दी, त्यांचीच पोरं खेळतात म्हटल्यावर बक्षिसे लावणार आणि देणार पण. लहान मुले शाळा, शिकवण्या बुडवून सामने बघायला.  बायका सुद्धा किती रणा झाल्या आणि कोण जिंकले म्हणून विचारायच्या.  कारखान्याचा संघ परगावच्या संघा विरुद्ध हरणे म्हणजे दोन दिवस सुतकच असायचे कारखान्याच्या चारी चाळीवर

अश्या एकदम स्वर्गीय आणि जिंदादिल कारखान्यावरच्या वातावरणात बालपनाच आणि तरुणपणाचा आनंद लुटण्याचे भाग्य लाभले. आज फक्त दहाच वर्षा नंतर गेलो होतो. थोडी आशा होती कि सगळेच नाही पण भूतकाळातील काही क्षण तरी पुन्हा अनुभवू शकेल. मान्यय आजवर कुणालाच भूतकाळ पुन्हा जावून पकडायला जमले नाही पण तो उध्वस्त होताना आणि झालेला पाहण्याचे दुर्भाग्य पण खूप कमी लोकांच्या नशिबात आले असेल.

तो ओस पडलेला कारखाना, ज्या मैदानावर आम्ही अनेक सामने गाजवले त्या मैदानाचे आणि स्टेजचे रुपांतर एखाद्या भीषण उजाड स्थळात झालेले,
ते कायम भरलेले असलेले देवूळ रिकामे पाहूनच हृदयात धस्स झाले. एखाद्या गावावर गाढवाचा नांगर फिरवणे म्हणजे काय असते त्याची जाणीव झाली.

चावट भेटला. जिथे जिथे आम्ही टवाळक्या करत फिरायचो, अभ्यासाला जायचो,  तिथं जावून तोच आनंद मिळवायचा प्रयत्न करत होतो आणि चावटला कंटाळा येत होता. संध्याकाळी बसलो दोन चार पेग झाले आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी येवू लागले.

च्यायला, ये आयघाल्या रडायला काय झालं, च्यामायला, देवाच्या दयेने चांगलं झालंय, एक नंबर पगाराय, बायको लेकरं मस्त हायती, आई बाप खुश हायती आणि तुला काय बोक आलाय रडायला. का काय अडचनाय का घरी? च्यायला तू लका एक नंबर दादा माणूस रड्तुस काय बाया सारखं.

त्याचं लेक्चर होवू दिलं आणि म्हणालो काय न्हाय झालं तू वड ती राहिलेली आपल्याला अजून मागवयाचीय.