Tuesday, December 13, 2016

आर्थिक देशीवाद

शहरे अंगावर घेणे आणि यशस्वी होणे हि लोकांची तत्कालीन गरज आहे. तो काय भारतासमोर ओ करून उभ्या राहिलेल्या गरिबी, शहरीकरण, प्रदूषण, बकालीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मजुरांची पिळवणूक आणि शेवटी जातीयवाद यावरचा उपाय असूच शकत नाही. 

आपण म्याक्रो लेेवलला जर विचार केला तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारल्या शिवाय भारत आणि भारतातील लोकांचा विकास होऊ शकणार नाही. सगळेच ग्रामीण भागातले लोक जर गावगाड्यात स्थान नसलेल्या आणि गावगाड्यात सर्वोच्च स्थान असलेल्या आयतखाऊ जातींनीसमूहांनी शहरात येऊन आपल्या तथाकथित वोळखी निर्माण केल्या म्हणून गावं सोडून शहरे अंगावर घ्यायला चालू केली तर शहरात रहायला सोडा उभे राहायला जागा मिळणार नाही. 

जेंव्हा नेमाडे  एक देशीवादी  म्हणून विचार करतात  तेव्हा  फक्त  चांगदेव  काय  म्हणतो हे  विचारात न घेता पांडुरंग काय  म्हणतो, खंडेराव काय म्हणतो याचा विचार तर करावाच  लागेल  पण स्वतः  नेमाडे देशीवादाविषयी  काय  बोलतात  याचा पण विचार करावा  लागेल. 

नेमाडे जेव्हा देशीवाद किंवा जुन्या तथाकथित हिंदू संकृतीचे गोडवे गातात तेव्हा त्यांना या संस्कृती मध्ये अगदी जैन- बुद्ध काळापासून ते आजपर्यंतची संस्कृती अभिप्रेत असते. समाजासाठी एक उत्कृष्ट आर्थिकसामाजिकराजकीय व्यवस्था देण्यासाठी आपल्याला पाश्च्यात्य भांडवलशाही जिने आता Crony colonialism चे रूप घेतलेले आहे ती परवडणारी नाही तसेच ती १३० कोटी लोकांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकत पण तिच्यात नाही. आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला आपल्या संस्कृतीत आपल्या परंपराधे सापडतील. जे वाईट आहे ते सोडून जे चांगले आहे ते टिकवून, त्याच्यात काळानुरूप बदल करून, भारताच्या सर्व समजला न्याय देणारी संस्कृती उभे केली जाऊ शकते, हा आशावाद देशीवादा मधे आहे. हा भाबडा आशावाद आहे का? आपण खूप पुढे निघून आलोय का ? उदारीकरणाने आपले मागे फिरायचे दरवाजे बंद केलेत का ? तर माझे उत्तर आहे "नाही" उदारीकरणाच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी उदारीकरण सोडून न देता आपल्याल हवे तसे वापरून आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून एक नवा समृद्ध देश, समाज निर्माण  करू शकतो. तोच देशीवाद. स्वतःच्या भाषेत लिहिणे, स्वतःच्या भाषेत बोलणे, स्वतच्या भाषेत व्यापार करणे हा देशीवाद उदारीकारनाच्या ह्या जगत  सुद्धा अनेक युरोपियन आणि पौर्वात्य देश टिकवून आहेत. (असो तो मुद्दा वेगळाय)

आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याच  मातीत सापडतील म्हटले कि म्हटले कि लगेचच "मग जातीवादा विषयी आपले काय मत आहे हा एकंच धोशा सुरु होऊन "मुर्दाबाद - मुर्दाबाद" च्या घोषणा देण्या ऐवजीदेशीवाद म्हणजे जातीयवाद नाही हे समजण्याचा प्रयत्न करावा. नाही केला तरी हरकत नाही. किंवा तुम्ही गावे सोडल्या नंतर जातीयवाद नष्ट झाला का आणि ज्यांनी अगोदर गावे सोडली त्यांनी प्रगती केली हे गृहीतक जरी मान्य केले तरी आता उशिराने पांडुरंग चांगदेव खंडेराव यानी गावे सोडायला चालू केले तर तोच खेड्यातील जातीयवाद शहरात एका वेगळ्या रुपात वावरणार नाही कशावरून?

छोटे  लोक स्वतः साठी , स्वतःच्या जातीसाठी, मातृभाषिक लोकासाठी उत्तरे शोधत असतात, मोठी माणसं पूर्ण समाजासाठी उत्तरे शोधत असतात. ज्यांनी कुणी गावे सोडून शहरे अंगावर घेतली त्यांचे अभिनंदन  आहे, त्यांच्या पुढे तोच पर्याय होता पण तोच पर्यार सगळ्या पुढे  आणून सोडणे आणि सगळ्यांना आव्हान देणे कि आता तू पण गाव सोड आणि मोठा होऊन दाखव हे प्रश्नाचे तत्कालीन समाधान  शोधने आहे ह्याने संपूर्ण समाजाला दिशा मिळणार  नाही  परंतु  समाजापुढे  आणखी  कठीण  प्रश्न  तेवढे  निर्माण  करून ठेवील .  








No comments:

Post a Comment